Friday, 20 August 2010

अवेळीच केव्हा दाटला अंधार

कवी ना. धो. महानोर हे खरेतर निसर्गकवी पण त्यांच्या कविता केवळ प्रणयरम्य व शृंगाररस युक्त असतात म्हणून वाचणारे व ऐकणारे अनेकजण असतील. हा खरे तर त्यांच्यातील कवित्वाचा अपमान आहे. त्यांच्या कवितेतील शृंगाररसाला नाके मुरडणे जितके चूक तितकेच त्यांच्या कवितेतील केवळ शृंगाररसाचा आस्वाद घेणे अयोग्य होय.

श्रीधर फडक्यांची 'काही बोलायाचे आहे ही ध्वनिफित जेव्हा ऐकली तेव्हा मला ही कविता विशेष भावली. किंबहूना पुढे कित्येक दिवस ती माझ्या मनांत रेंगाळत राहिली. विशेषत: त्यातील दुसरे कडवे. त्यातील करुण रस, विरह यातना मनाला चटका लावून जातात. महानोरांच्या कवितांना ग्रामीण मराठीचा सुगंध आहे. अगदी थोड्या पण अचूक शब्दात ते कवितेचा आशय व्यक्त करतात आणि कविता वाचताना डोळ्यापुढे जणू शब्दचित्रच उभे राहते.

गावाबाहेरील एखादे निर्जन स्थळ, घरच्यांची करडी नजर चुकवून आपल्या प्रियकराला भेटायला जाणारी आपली नायिका - अभिसारिका, त्या नायिकेची वाट पाहत संकेतस्थळी एकाकी उभा असलेला तो प्रियकर आणि उशीरा का होईना पण दिलासादायक असे तिचे ते येणे.

एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले,
हासतांना नभ कलून गेलेले

अनेक दिवसांनंतर असा एकान्त मिळाल्याने मोहरून गेलेले ते प्रेमी युगुल एकमेकांकडे भावूकतेने निशब्दपणे पाहात राहतात. हृदयांत, मनांत आनंदाचे कारंजे फुलले आहे आणि यामध्येच बरांच काळ निघून जातो व दिवस कलतो.

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर,
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर

दिवस कलून रात्रीचा पहिला प्रहर चालू होतो. तो आणि ती दोघेही भानावर येतात. तो तिच्याकडे पुन्हा एकदा निरखून पाहतो आणि त्याला वाटते जणू आकाशातील चांदण्याच तिच्या तनुलतेला सजवित आहेत.

आणि माझा मला पडला विसर,
मिठीत थरके भरातील ज्वार

हे पाहून तो बेभान होतो आणि त्याचे विषयासक्त मन स्वत:ला आवर घालू शकत नाही आणि ते उत्कट प्रणयाच्या लाटेत वाहून जातात.

ते दोघे संपूर्ण रात्र तिथेच घालवितात. ती त्याला नंतर बरेच दिवस भेटत नाही. त्याला वाटते कि, तिच्या घरच्यांना झाल्या प्रकाराची कुणकुण लागल्याने तिला कोणा नातेवाईकाकडे पाठविले असावे.

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली,
तिच्या पोटी कुण्या राव्याची साऊली

आणि एक दिवस अचानक ती त्याला भेटते. मात्र यावेळी ती एकटी नसते तर तिच्या पोटी कुणाचा तरी वंश वाढत असतो.

तिच्या डोळीयांत जरा मी पाहिले,
काजळात चंद्र बुडून गेलेले

त्याची जरी तिच्यांत केवळ शारीरिक गुंतवणूक असली तरी तिचे स्त्रीमन त्याच्यात भावनिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतलेले असते. ह्यावेळी जेव्हा तो तिच्या डोळ्यात पाहतो तेव्हा त्याला खोल कुठेतरी जाणवते की तिच्या डोळ्यातला तो मोद, ते हास्य घनतमात बुडून गेलेले आहे. ती त्या विरहाग्नीत होरपळून निघालेली आहे.

अवेळीच केव्हा दाटला अंधार,
तिला गळा जड झाले काळेसर....

मनाविरुद्ध झालेल्या अनपेक्षित लग्नामुळे तिच्या जीवनांत जो असमयी अघटित काळोख निर्माण झाला आहे तो शब्दात व्यक्त करणे खरोखरच कठिण होय यमक्या कवी आणि महानोर यांच्यातील फरक इथे जाणवतो. तिच्या संपूर्ण आयुष्याची तडफड त्यांनी अवघ्या २- ४ ओळीत अचूक मांडली आहे. फक्त कोमल, भावूक, तरल मनाच्याच व्यक्तीच ही कविता अनुभवू शकतात.

खरोखरच ना. धों. च्या अवघ्या १२ ओळी आणि श्रीधरजींचा आवाज कुठल्याही संवेदनशील, हळव्या मनाला अस्वस्थ करून सोडतात.

Original post : अवेळीच केव्हा दाटला अंधार

Thursday, 15 July 2010

આકાશગંગા, સૂર્ય, ચંદ્ર, તારા ।

આકાશગંગા, સૂર્ય, ચંદ્ર, તારા ।
સંધ્યા, ઇષા કોઈ ના નથી ।।

કોની ભૂમિ, કોની નદી, કોની સાગરધારા ।
ભેદ કેવલ શબ્દ, અમારા ને તમારા ।।

એજ હાસ્ય એજ રુદન આશા એ નિરાશા ।
એજ માનવ ઊર્મિ પણ ભિન્ન ભાષા ।।

મેઘ ધનુ અંદર ના હોય કધી જંગો ।
સુંદરતા કાજ બન્યા વિવિધ રંગો ।।

- કવિ અજ્ઞાત

शाळेत असताना आम्ही म्हणत असू ते समूहगीत...

भारतमाता परमवंद्य धरा, मायभू अमुची, कोटी बांधव हे आम्ही ।
आणूनिया पावन सूर सरिता श्रम गंगा म्लानमुखी स्मित कमळे फुलवू ।।
विविध जरी भाषा, भिन्न धर्म दिशा, प्रगति पंथ तरी एक असे ।
येऊ दे अंधार वा वादळी असू दे हवा, चाललो ध्येयाकडे....
मातेसाठी सर्वस्वाचे बलिदान करू ।।
सळसळत्या सोनेरी शेतातूनी कसणार्‍या बाहूंची संजीवनी ।
अमुच्या कामातूनी, घामातूनी, रक्तातूनी, निपजो सुजल धरा, सुफल धरा ।।
निजशक्तिविण आम्हा आधार दुजा नाही ।
अमुच्याच प्रयत्नांची आम्हांस खरी ग्वाही,
मातेसाठी सर्वस्वाचे बलिदान करू ।।

- कवि अज्ञात आहेत. कोणाला ठाऊक असल्यास कळवावे.

Monday, 14 June 2010

मन को अति भावे प्रसूनजी के गीत।

भारतीय चित्रपट उद्योग से जुडे हुएँ प्रख्यात गीतकार महामहिम प्रसून जोशीजी का जन्म उत्तराखण्ड के अल्मोडा में १६ सितंबर १९७१ में हुआ उन्होने अपने व्यावसायिक लेखन का आरंभ विज्ञापनों के संहिताओं के लेखन से किया और फिर धीरे धीरे वे भारतीय चित्रपटों के लिएँ गीत लिखने लगे


उनकी एक विशेषता यह है की उन्होने निश्चय किया के वे कतई प्यार, मोहब्बत, इश्क जैसे िसे िटे शब्दों का प्रयोग अपने गीतों में नहीं करेंगे इस कारण उनके द्वारा रचें गएँ चित्रपट गीतों के बोल केवल लोगों के द्वारा सराहे गएँ अपितु वे हृदयस्थ हो गएँ हैं उदाहरण के तौर पर तारे जमीन पर, हम तुम, दिल्ली , रंग दे बसंती यह चित्रपट भले ही २-३ साल पहले आएँ थे पर उन चित्रपटों के गीतों को आज भी रेडियो पर बार बार सुनाया जाता हैं

हांल ही में मैंने एक पुस्तक में पढ़ा की एक समय था जब हिंदी चित्रपटों के गीतों और संवादो के लेखन में देशज या तद्भव, तत्सम शब्दों उपयोग अधिक होता था परन्तु बाद में हिंदी चित्रपटों का चलन पाकिस्तान एवं मध्य पूर्वी देशों में बढ़ाने हेतु उनमें उर्दू शब्दों के उपयोग को अत्यधिक महत्त्व दिया गया इस कारण हिंदी चित्रपटों में हिंदी की विभिन्न बोलिओं का प्रयोग कम होता गया


परन्तु पिछले साल प्रसूनजी ने खड़ी बोली और संस्कृत के शब्दों का अद्भूत मिश्रण कर "मन को अति भावे सैंया" जैसा एक हृदयस्पर्शी, अनुठा चित्रपट गीत लिखा जिसने लोगों के मन को छू लिया है उसमें जो विशुद्ध हिंदी का लहेज़ा है उसकी तो बात ही निराली है


इस गीत पर टिप्पणी करते हुएँ मेरे राञ्ची के मित्र और हिंदी साहित्य के व्यासंगी श्री. मनिष कुमारजी अपने ब्लाग में कहते हैं की जब भी हम भावातिरेक में होते हैं तो आंचलिक भाषाओं से जुडे हुएँ शब्दों का प्रयोग करते हैं


सच में प्रसूनजी के गीत के शब्दों का जादु मन को उल्लसित कर देता है 'पुष्प गएँ, खिलखिला गएँ, उत्सव मनाता है सारा चमन' यह सुनके अपना मन भी खिलखिला उठता है

Tuesday, 1 December 2009

मुन्शीराम डाकिया






लेकर पीला पीला थैला,
पत्र बाँटने आता,
यह है मुन्शीराम डाकिया,
सब की चिठ्ठी लाता ।।

सर्दी हो या गर्मी,
पानी गिरता झरझर,
चला जाएँगा नही रुकेगा,
चिठ्ठी देता घरघर ।।

बड़े डाकखाने से आता,
लाता कभी रुपैया,
कभी किताबें दे जाता है,
मुझ को हँस हँस भैया ।।

गाँव गाँव जाता है,
पर कभी नहीं थकता है,
लाता है सब की खुशखबरी,
सब के मन को भाता है ।।


This poem was in my 5th Standard Hindi textbook in 1985-86. Please let me know the poet if you know the one.

Wednesday, 14 October 2009

काही साहित्यिक भोग

स्थळ : पुणे शहरातील एक बस स्टॉप.
पात्रे : खडूस ह्या शब्दाखेरीज दुसरा शब्द सापडू नये असल्या नमुन्याचे सत्तरीच्या घरातले गृहस्थ. मी त्यांच्या बाजुला जाऊन रांग धरतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही क्षण ते गृहस्थ मला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. मी समोरच्या करांडे टेलर्स चे करांडे एका लठ्ठ गृहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृश्य पाहण्याचा बहाणा करतो.

इतक्यात कानावर आवाज...

ते उपाख्य बाजी गणेश जोशी : दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे हो?
मी : काही कल्पना नाही बुवा?
बा.ज.गो. : पुण्यातच राहता ना? (ह्या त्यांच्या प्रश्नावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.)
मी : हो.
बा.ज.गो. : किती वर्षे?
मी : बरीच.
बा.ज.गो. : काय व्यवसाय?
मी : पुस्तके वैगरे लिहितो.
बा.ज.गो. : म्हणजे साहित्यिक आणि तरीही तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठौक नाही?
मी : आपण कुठल्या गावाहून आलात?
बा.ज.गो. : मी कशाला कुठल्या गावाहून येतोय? इथेच जन्मलो आणि इथेच मरणार.
मी : ('कधी' हा प्रश्न गिळून) इथेच मरणार कशावरून?
बा.ज.गो. : दशभुजा गणपती ठौक नाही हे सरळ सांगा. आमच्या मरणाची काळजी करू नका. तुम्हाला काही मी खांद्याला बोलावणार नाही.
मी : खांद्याची आमंत्रणं काय स्वत: मृतांच्या सहीने जातात वाटतं?
बा.ज.गो. : हे पहा, तुम्ही साहित्यिक असल्याने भाषाप्रभुत्व हा तुमचाच जन्मसिद्ध हक्क मानायची गरज नाही. मी देखील पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून स्वत:ला साहित्यिक म्हणवणार्‍या माणसाला दशभुजा गणपती ठौक नसावा? ही तुमची समाजाविषयी आस्था... उद्या शनवारवाडा ठौक नाही म्हणाल, परवा पर्वती ठौक नाही म्हणाल.
मी : तुम्हाला तरी कुठे ठाऊक आहे दशभुजा गणपती?
बा.ज.गो. : ठौक आहे.
मी : मग मला कशाला विचारताय?
बा.ज.गो. : तुम्हाला ठौक आहे की नाही ते पाहायला.
मी : पण दशभुजा गणपतीशी माझा काय संबंध?
बा.ज.गो. : सांगतो. 'पुणे शहरातील ढासळती धर्मभावना' ह्या विषयावर लेखमाला लिहितोय मी. ह्या स्टॉपवर सकाळी सात पासून उभा आहे मी. बेचाळीस लोकांत दशभुजा गणपती ठौक असलेला केवळ एक निघाला. पण त्या देवळासमोर त्याचे ष्टो दुरुस्तीचे दुकान आहे अकरा वर्षे. कधी आत दर्शनाला गेला नाही.
मी : म्हणजे दशभुजा गणपती फक्त पत्त्यापुरता.
बा.ज.गो. : हीच तर ट्रॅजेडी. देवळांचा उपयोग पत्त्यासाठी? एकदा आम्ही विचारले, डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसुतीगृह कुठे आहे? तर एक गृहस्थ म्हणाला, 'सोमण मारुतीपुढे!' अरे काही सारासारविवेकबुद्धी? अरे निदान प्रसुतीगृहाच्या पत्त्यासाठी तरी मारुतीराया वापरू नका ! काय?
मी : खरे आहे.
बा.ज.गो. : एक साहित्यिक म्हणून तरी देवळात जाणे तुम्ही तुमचे कर्तव्य मानता की नाही?
मी : (देवावर भार घालून) मानतो तर...
बा.ज.गो. : मग जाता का?
मी : दशभुजा गणपतीला जात नाही.
बा.ज.गो. : I'm not particular about this Ganpati or that. (रिटायर्ट म्हातारा भडकला की इंग्रजीत फुटतो.) Any temple for the matter of that. (प्रत्येक 'द्याट' वर पाय आपटून) रोज जाता?
मी : (देवा! क्षमा कर. आपली जेव्हा भेट होईल तेव्हा खुलासा करेन.) हो. रोजच म्हणायला हरकत नाही. बा.ज.गो. : मला 'होय की नाही' चा रकाना भरायचा आहे. हो किंवा नाही.
मी : (Forgive me Oh Lord!) हो. (आता हे खोटे नाही. रोज रात्री गुडकुले विठोबाच्या देवळात काणे भटजी, विठोबा टेलर, सोपानराव हेयरड्रेसर आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा, शंभर पाँईंट. आषाढी कार्तिकीला काणे भटजी पाँईंट वाढवा म्हणतात पण आम्ही ऐकत नाही).
बा.ज.गो. : एक साहित्यिक ह्या दृष्टीने तुमची धर्मावर श्रद्धा आहे की नाही?
मी : श्रद्धा ही वस्तुच मुळी देव आणि धर्म ह्यांच्यावर ठेवायला तयार केली आहे असे माझे मत आहे.

(गोल पोटावरून तळव्यापर्यंत प्यांटीचं माप घेताना समोरच्या करांडे टेलर्सने टेप बेंबीपासून ओळंबा धरावा तशी सोडली आहे. हे मोहक दृश्य पाहायला मला उसंत न देता...)
बा.ग.जो. : तुम्ही सरळ हो की नाही सांगा.
मी : हो. कारण धर्मावर श्रद्धा ठेवायची नाही तर काय मुन्सिपालटी, जिल्हाबोर्ड, बसवाले, हॉटेलवाले ह्यांच्यावर ठेवायची ?
बा.ग.जो. : तुम्ही कृपा करून वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल असे उत्तर द्या. शेवटी प्रश्नचिन्ह नको.
मी : (मुकाट्याने) बरं.
बा.ग.जो. : आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे की नाही ?
मी : यथेच्छ श्रद्धा आहे कारण धर्म नसता तर दसरा, होळी, दिवाळी, नारळी पौर्णिमा म्हणजे पुरणपोळी, कडबू, मोदक बघायला सुद्धा मिळाले नसते. सत्यनारायण नसता तर असला शेराला सव्वाशेर तुपाचा शिरा खायला मिळाला नसता.
बा.ग.जो. : तुमच्या बोलण्यात थट्टेचा सूर आहे. धर्म काय शिरा खाण्यासाठी आहे? (इथे बा.ग.जो. नी शीरा ताणून हा प्रश्न विचारला).
मी : शिर्‍याशिवाय सत्यनारायण करून दाखवा, होडी बुडेल.
बा.ग.जो. : तो शिरा नसतो, प्रसाद असतो.
मी : सत्यनारायणाला खारीक वाटता येणार नाही. प्रसाद म्हणून सुद्धा. माफ करा, पण तुम्ही मला छुपे कम्युनिस्ट दिसता. (होतकरू साहित्यिकांस सूचना : अधून मधून अशी टफ लाईन स्वीकारावी. कम्युनिस्ट कसे बिगर कम्युनिस्टांना प्रतिक्रांतिवादी म्हणतात तीच स्टाईल.)
बा.ग.जो. : मी कम्युनिस्ट ? दशभुजा गणपती कुठे आहे हे तुम्हाला ठौक नाही आणि मी कम्युनिस्ट ? मी : (पुण्यात नव्या एका देवाला जन्म देत) झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगा पाहू ?
बा.ग.जो. : झोपाळू नरसोबा ? पहिल्यांदाच ऐकतोय.
मी : झोपाळू नरसोबा पहिल्यांदाच ऐकताय काय? अरेरे. प्रश्न आला. झोपाळू नरसोबा सारख्या जागृत देवाचे नाव पहिल्यांदाच ऐकताय हे ऐकून आश्चर्य वाटलं. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघाले आहेत. (होतकरू साहित्यिक प्लीज नोट : वादाच्या प्रसंगी प्रतिपक्षाने न केलेल्या मुद्द्यांवर जोर द्यावा.) सत्यनारायणाला खारका ? उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल..
बा.ग.जो. : तुम्ही हे कोणाला सांगता आहात?
मी : तुम्हाला ! इथे दुसरे आहे कोण? सॉरी, दुसरे कोणी नाही. पूर्णविराम.
बा.ग.जो. : तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. आपण राहता कुठे ?
मी : (मी इथे खरी कसोटी आहे. डिटेलवार पत्ता देऊन गोंधळात टाकायच्या शास्त्राचा अभ्यास असल्याखेरीज ह्या कसोटीला उतरता येणार नाही.) तुम्हाला झोपाळू नरसोबा ठाऊक नाही, बरं रेडेकर तालीम तरी ठाऊक असेल !
बा.ग.जो. : ती कुठेशी आली ?
मी : रविवारात. घाणेकरांच्या कोळश्याच्या वखारीला लागून.
बा.ग.जो. : काढीन शोधून. घाणेकर तालीम...
मी : घाणेकर तालीम नाही घाणेकर कोळश्याची वखार. त्याला लागून रेडेकर तालीम. रास्ते वाड्यावरून खाली या सरळ (इथे खाली येणे ह्याचा हवा तसा अर्थ घ्यावा). तिथे घाणेकर कोळश्याची वखार विचारा. तिथे घाणेकरांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठेशी राहतात? पापडवाल्या बेंद्र्यांच्या वाड्यावरून गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर बखळ (गल्लीला दोन टोके असतात ते विसरणे). माशेलकर बखळीत विचारायचे संपतराव लाँड्री कुठे आहे?
बा.ग.जो. : जरा सावकाश सांगा मी लिहून घेतो आहे. आताशा कापडवाल्या बेंद्र्यांच्या पर्यंत आलेलो आहे. मी : कापडवाले बेंद्रे नाहीत पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. मग माशेलकर बखळ, मग संपतराव लाँड्री. (बस येईपर्यंत बा.ग.जो. ना घुमवायच्या बेताने) संपतराव लाँड्रीत सोनार आहेत का विचारायचे. ते तुम्हाला भोरप्यांचा वाडा दाखवतील.
बा.ग.जो. : भोरप्यांचा ? थांबा, जरा सावकाश सांगा.
मी : सावकाश काय सांगा, बस आली म्हणजे?
बा.ग.जो. : बस कशी येईल ?
मी : म्हणजे?
बा.ग.जो. : हा बस स्टॉप क्यान्सल झाला आहे.
मी : काय म्हणता ? बा.ग.जो. : अहो ! पंधरा दिवस झाले हा वनवे झालेला आहे. इकडून प्रवेश बंद. एकतरी बस इथून येऊन तिथे गेली का?
मी : मग मघाशी का नाही सांगितलत?
बा.ग.जो. : वा ! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो, साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे ठौक नाहीत. कमाल आहे. काय नाव तुमचे ?
मी : (स्वत:चे नवीन बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते.
बा.ग.जो. : आजच हे नाव ऐकतोय.
मी : मी सुद्धा! (बा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध आहेत ते न पाहता मी सटकतो. तात्पर्य : देवावर भार घालून सुद्धा भोग सुटतातच असे नाही.)

लेखक - पु.ल. देशपांडे.

Sunday, 27 September 2009

ठकास महाठक

ठाण्यामध्ये श्री. कखग नावाचे एक मराठी लघु उद्योजक आहेत. त्यांचा कारखाना ज्या उद्योगभवनात आहे तिथे असलेल्या इतर ११ कारखान्यांचे मालक हे अमराठी आहेत. हे सर्व अमराठी मालक सदैव संघटित असतात. विशेषतः कामगारांचे शोषण करणे, चोरून वीज वापरणे, सरकारी कार्यशाळा निरिक्षकाला (फॅक्ट्री इंस्पेक्टरला) लाच देणे, शनिवारी रात्री मद्यपानी मेजवान्या झोडणे ह्या बाबतीत त्यांची मते एकमेकांशी जुळतात. श्री. कखग ह्या गटात मोडत नसल्यामुळे थोडेसे वेगळे पडतात.

तर सांगायची गोष्ट ही की दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी स्थानिक शाखेतील मावळे त्या उद्योगभवनात येऊन उत्सवासाठी काही प्रोत्साहनपर रक्कम (देणगी / खंडणी) घेऊन जातात. श्री. कखग यांची पद्धत अशी होती की ते इतर ११ मालकांकडून प्रत्येकी रु. १००/- घेऊन, घासाघीस करून, गोड बोलून मावळ्यांना रु. १५०० ऐवजी रु. ११००/- मध्ये पटवायचे आणि चहा-नाश्ता देऊन कटवायचे. ते स्वतःचे पैसे घालत नसत. कारण आपले पैसे केवळ सुरवाणी, जिज्ञासा, हरियाली इ. चांगल्या संस्थांना देण्यासाठीच आहेत ह्या बद्दल त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती.

२-३ वर्षांनी इतरांना ह्या गोष्टीचा सुगावा लागला. त्यांनी सर्वांनी मिळून ठरवले की ह्या वर्षी श्री. कखग ह्यांना पैसे खर्च करायला लावायचेच. लगेच ते कखग यांच्याकडे आले व म्हणाले, "कखगभावु, ह्या वख्ताला गनेश फेस्टिवलासाठी पैसे सर्वानी वायले वायले देवुया. " कखग ह्यांनी मान डोलावली.

सालाबाद प्रमाणे जुलैमध्ये मावळे उगवले. लगेच कखग ह्यांनी त्यांचे चहा, नाश्ता देऊन प्रेमाने स्वागत केले. हवापाण्याच्या गप्पा केल्या. नंतर विनम्र स्वरांत म्हणाले की यंदा थोडी पद्धत बदललेली आहे. आम्ही सर्व लोक आपापले पैसे वेगळे देणार आहोत. हे माझे दीडशे रुपये घ्या.

पण एक सांगतो, इतर गाळेवाले उगाचच मंदीचे कारण सांगून पैसे द्यायला काचकुच करतील. हे काही बरोबर नाही. एऱ्हवी ह्यांच्याकडे पार्ट्या करायला भरपुर पैसा आहे. तुम्ही एक काम करा, प्रत्येकाकडून कमीत कमी अडिचशे घ्या, सोडू नका एकालाही. आपला उत्सव थाटामाटात झाला पाहिजे.

पुढे काय घडले ते सुज्ञांस सांगणे न लगे.