Saturday, 23 August 2008
संस्कृत२
छोटा सत्यकाम एके दिवशी आईला म्हणाला, "आई, मला शिकावेसे वाटते".
आई म्हणाली, "जरूर शिक. ब्रह्मज्ञानी हो."
सत्यकाम म्हणाला, "आई, आपण कोण, कुठले?"
आई म्हणाली, "बाळ, बस इथे, मी तुला सगळे सांगते."
दुसर्या दिवशी सत्यकाम हरिद्रुम गौतम ऋषींच्या आश्रमात गेला आणि म्हणाला, "गुरुजी, मला तुमच्याकडे शिकायचे, ब्रह्मज्ञानी व्हायचे आहे".
गौतम ऋषी म्हणाले, "बाळ बस. पाणी घे. कोण तू? कुठून आलास? तुझे वडिल काय करतात? तुझे गोत्र काय?".
सत्यकाम दृढतेने म्हणाला, "गुरुजी, माझे नाव सत्यकाम. काल मला जे आई म्हणाली तेच आज मी तुम्हाला सांगत आहे. आई म्हणाली, बाळा, मी तरुण असताना अनेक ठिकाणी दासी म्हणून राहिले. तेव्हाच तुझा जन्म झाला. तुझे वडिल कोण हे मी पण निश्चित सांगू शकत नाही. गुरुजी विचारतील तेव्हा हेच सांग की जबालेचा पुत्र म्हणून मी जाबाली."
त्यावर गौतम ऋषी म्हणाले, "जो सत्य बोलतो, निर्मळ मनाचा, निष्कलंक विचारांचा, अंतर्बाह्य पारदर्शक असतो तोच ब्राह्मण होय (नोंद घ्यावी). हे सौम्या, थोड्या समिधा आण. आपण सत्यकामाचा उपनयन विधी करू".
पुढे असा हा दासीपुत्र सत्यकाम गौतम ऋषींच्या आश्रमात राहिला. त्याने वेदाध्ययन केले. तो वेद पारंगत झाला.
[मात्र सत्यकामाला ब्रह्मज्ञानाची आस लागली होती. गौतम ऋषींचा शिष्य असतानाच त्याला ब्रह्मज्ञान मिळते पण अगदी वेगळ्या पद्धतीने ज्याची एक वेगळी कथा आहे. जी पुन्हा कधीतरी.]
(वरील सर्वांचे संवाद संपूर्ण संस्कृतमध्ये, मूळ संस्कृतमधील उपनिषद संहिता मंडईत उपलब्ध)
आधुनिक दान
एका लेखकाने तिचे अचूक वर्णन केले आहे. तो म्हणतो, मुंबईच्या रेल्वेत दारातले लोक तुम्हाला आत घुसू देणार नाहीत पण एकदा का तुम्ही आत शिरलात की हेच लोक तुम्ही दारातून खाली पडू नये म्हणून तुमचा तोल सावरतील. तुम्हाला दरवाज्यात उभे राह्यला बळ देतील. तुम्हाला स्वत:त सामावून घेतील.
आम्ही मुंबईकरांनी प्रत्येक आपत्तीत हेच अनुभवले आहे. आणीबाणीच्या प्रसंगात मुंबईकर दुसर्यासाठी आपला जीव सुद्धा धोक्यात घालतो. संकटकाळी समोरच्याला जमेल ती मदत करणे हाच अस्सल मुंबईकराचा धर्म होय.
एकच उदाहरण द्यायचे म्हणजे बाँबस्फोट इ. झाल्यावर रक्त देण्यासाठी लागणारी रांग. अगदी लांब लांबहून लोक त्यासाठी ज्या ठिकाणी निकड असेल त्या ठिकाणी पोहोचतात. तरुण, वयस्क, बायका कोणीही मागे राहात नाही.
मुख्य म्हणजे रक्तदानात दिवाभीत समजला जाणारा गुजराती समाज विशेष पुढे आहे आणि मराठी तरुण थोडा मागे आहे. चालायचेच.
मी तर म्हणेन रक्तदान असे दान आहे की ज्यामुळे तुमच्या खिशाला काही तोशीस पडत नाही. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे फारच थोडे रक्त आपल्या शरीरातून काढले जाते जे २४ तासांच्या आत भरून निघते.
विशेषत: रक्ताचा कर्करोग किंवा काही दुर्मिळ आजारी व्यक्तींसाठी निरोगी लोकांनी मुद्दाम रक्त दिले पाहिजे. कारण अश्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. पण बरेचदा आपण बघतो की रुग्णांचे जवळचे नातेवाईकसुद्धा रक्त द्यायचे टाळतात. ह्या पाठी अनेक गैरसमज कारणीभूत आहेत.
१) रक्त दिल्याने एड्स होतो - हल्ली सर्वत्र इंजेक्शनसाठी "वापरा आणि फेकून द्या" पद्धतीच्या सुया वापरल्या जातात. रक्त घेताना लागणारी सर्व उपकरणे निर्जंतुक केलेली असतात.
२) रक्त दिल्याने अशक्तपणा येतो - जर रक्त देण्यापूर्वी व दिल्यानंतर भरपूर खाल्ले तर कुठल्याही प्रकारे अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही असा माझा अनुभव आहे. कॉफी आणि बिस्किटे तर रक्तदान केल्यावर डॉक्टर लगेचच देतातच.
असो. ह्या विषयीचे इतर गैरसमज ह्या मंचावरील डॉक्टर मंडळी दूर करतीलच. पण मी एव्हढेच म्हणेन की दिलेल्या रक्तामुळे आपल्या शरीरात जी रक्ताची कमी निर्माण होते ती २४ तासांत भरून निघतेच वर आपल्या शरीराकडून नवीन रक्ताची निर्मिती झाल्याने प्रसन्न वाटते.
भारतीयांसाठी दुवा क्र. १ ही एक अशी निरपेक्ष वेबसाईट आहे जिथे प्रत्येक सुदृढ व्यक्तीने नाव नोंदविले पाहिजे. ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या जवळ रक्त देण्याची सोय उपलब्ध करून देते.
अर्थात आंतरजालावर शोधले तर इतरही अश्या प्रकारचे काम करणार्या वेबसाईट मिळतीलच.
पूर्वी म्हणायचे,
अन्नदानं महादानं विद्यादानं अत: परम् ।
मी म्हणेन,
रक्तदानं परमोच्चदानं नेत्रदानं च सर्वोच्चेति ।
श्वानराजाधिराज
पण मूळ कुत्रे ज्यांचा संकर करून ही जात निर्माण केली गेली ते धनगर कुत्र्यांमधून शोधून काढण्यात आले होते. मूळातच धनगरांसोबत असलेले कुत्रे लढाऊ, तीक्ष्ण कानाचे, भेदक नजरेचे आणि धैर्यशाली असतात. ते प्रसंगी एकटे वाघावर पण चालून जातात.
मी परळच्या बैलघोडा रुग्णालयात कुत्र्यांवरच्या एका कार्यशाळेला गेले होते. तिथे असे ऐकले की हे धनगर लोक कुत्रे नखे तपासून, कानाचा आकार वैगरे पाहून कुत्रा निवडतात. एकदा पिल्लू पाळायचे ठरवले की एक मोठ्ठा खड्डा खणतात (हौदासारखा). त्यात त्या पिल्लाला ठेवतात आणि दिवसातून फक्त दोन- तीनदाच त्या कुत्र्याजवळ अन्न-पाणी ठेवायला आणि घाण साफ करायला त्याच्या जवळ जातात.
आता हे जे पिल्लु असते ते खड्ड्यात कंटाळते आणि कान देऊन मालक कधी येतोय त्याची वाट पाहाते. त्यामुळे जरा खुट्ट झाले की हे पिल्लू कान टवकारते. दुसरे म्हणजे, एकटेपणाची सवय होऊन ते आपोआपच माणूसघाणे बनते. तिसरे आणि महत्वाचे म्हणजे धनगरांच्या कळपात इतर कुत्र्यांबरोबर / माणसांसोबत राहून सुद्धा हा कुत्रा अन्नदात्याशी प्रामाणिक राहतो.
बुद्धिमत्ता
पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे.
मुलांच्या बुद्धिमत्तेला ओळखा.
थोर शिक्षण मानसशास्त्रज्ञ हॉवेल गार्डनरच्या मते मुलांच्यात एकूण आठ प्रकारची बुद्धिमत्ता असते आणि प्रत्येक पालकाने / शिक्षकाने मुलाच्यातील विविक्षित बुद्धिमत्ता ओळखून त्याला योग्य ते प्रोत्साहन दिले पाहिजे.
१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, कोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात.
२) तार्किक-गणिती = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले नमुने, प्रतवार्या, परस्पर संबंध, गणिती समस्या, व्युहरचनात्मक खेळ आणि विविध प्रयोग ह्यात रमतात.
३) शारीरिक हालचाल = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले शारीरिक संवेदनांनी ज्ञान ग्रहण करतात. ही मुले नृत्य, खेळ, विणकाम, भरतकाम, रांगोळी, हस्तकला, काष्ठकाम, शिल्पकला इ. प्रकारात रमतात.
४) अवकाशीय = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले जिगसॉ पझल, भुलभुलैय्या, लेगो खेळ (मेकॅनो), रेखाटणे किंवा दिवास्वप्नांत रमतात.
५) सांगीतिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले सतत ताल धरतात, गुणगुणतात. त्यांना इतरांना न ऐकू येणारे नाद आपल्या आजूबाजूच्या वातावरणात ऐकू येत असतात उदा. पाणी ठिबकणे, पाखरांचे कूजन. ही मुले उत्तम श्रोता असतात.
६) अंतर व्यक्तिगत = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले जन्मजात नेते असतात. त्यांच्याकडे उत्तम संवादकौशल्य असते, ते दुसर्यांचे अंतस्थ हेतू, भावना जाणतात. बरेचदा ही मुले दुसर्यांचे गुणदोष ओळखून त्यांच्यावर वर्चस्व गाजवतात.
७) स्वाधीन व्यक्तिगत = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले बरेचदा लाजाळू असतात. पण त्यांना स्वत:च्या भावनांची, मर्यादांची / वकूबाची जाणीव असते. ही मुले स्व-प्रेरित असतात.
जाता जाता : जिज्ञासूंनी ह्या विषयावरील अधिक माहितीसाठी इथे भेट द्यावी.
अनोखे वंशवृक्ष
मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या दोन्ही बाजूला काट्याकुट्या रोवून तिमक्काने जीवापाड जपलेल्या रोपट्यांचे आता डेरेदार वटवृक्ष झाले आहेत. बाजारात सुमारे ८५ कोटी रुपये इतकी किंमत असलेले हे वृक्ष वनविभागाने नुकतेच आपल्या ताब्यात घेतले. त्या बाजारभावाचा विचार कधी न तिमक्काच्या मनाला शिवला, न आज हयात नसलेल्या बिक्कालुच्या.
तिमक्काला नुकताच पंतप्रधानांच्या हस्ते सामाजिक वनीकरणासाठीचा राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देण्यात आला. कुणाही कृतार्थ आईने म्हणावं तशी तिमक्का त्यावेळी म्हणाली, "त्यांना मोठ्ठं होताना पाहणं ह्यातच माझे सुख आहे".
- मटा १९९५
रंगभेदी भारतीय
त्यावर लगेच त्याने आम्हाला घालायला हेल्मेट्स दिली आणि पुढे जाऊन तो पूल पहायला दिला आणि त्या विषयी सविस्तर माहिती सुद्धा दिली. तो पूल पहायला दिला आणि त्याविषयी सविस्तर माहिती सुद्धा दिली.
मनांत विचार आला की हा माणूस गोऱ्या कातडीचा युरोपीयन होता म्हणून कदाचित आमचे दिलखुलास आदरातिथ्य झाले, हेच जर का त्याच्याजागी माझी अमेरिकन कृष्णवर्णीय मैत्रिण शेली असती तर झाले असते का?
आजही आपण कृष्णवर्णीय अमेरिकन, आफ्रिकन आणि आशियायी पर्यटकांची दखल तरी घेतो का? ज्या उत्साहाने आपण श्वेतवर्णीय अमेरिकन, युरोपीयन,रशियन अगदी नेमके बोलायचे तर उझबेकी, कझाकी पर्यटकांचे सुद्धा आगत स्वागत करतो त्याच्या निम्म्याने तरी आपण ह्या कृष्णवर्णीय अमेरिकन, आफ्रिकन आणि आशियायी पर्यटकांना एक व्यक्ती म्हणून किंमत देतो का?
मुक्ता चित्रपटात एक प्रसंग आहे. मुक्ताचा अमेरिकन मित्र येणार म्हणून कणसे पाटील मंडळी अतिशय खुश असतात आणि जेव्हा तो प्रत्यक्ष येतो तेव्हा त्याचा कृष्णवर्ण पाहून अनेकांचे चेहरे उतरतात, एव्हढेच नव्हे तर त्याच्या विषयी कुत्सित बोलले पण जाते.
असे असताना आपण भारतीयांना रंगभेद, वर्णभेद ह्या विषयी बोलायचा नैतिक अधिकार उरला आहे का? आपल्याला काय वाटते?
दुध-दुभते (भाग १)
मा. शिरीष पै यांनी एके ठिकाणी लिहिले आहे की त्या रोज भल्या पहाटे दुध, दही, ताक इ. ची भांडी काढतात. वातावरण प्रसन्न असते. पाखरांचा किलबिलाट चालू असतो. त्या दुधाला दही लावतात. आधी लावलेल्या दह्याचे लोणी करायला घेतात. शांत वातावरणात केवळ रवी घुसळण्याचा आवाज घुमत राहतो.
त्यांना असे वाटते की जणू आपण त्या समयी गोकुळात आहोत आणि यशोदे मातेसारखे कृष्ण बाळासाठी हे दुध-दुभते करत आहोत. त्यांच्या अनेक नातेवाईक बायका त्यांच्या ह्या वेडेपणाला हसतात. पण त्या म्हणतात की मला हे दुध-दुभते करताना एक वेगळाच, छानसा आनंद मिळतो.
हाच आनंद तुम्ही पण अनुभवू शकता….
विरजण
दुधाचे दही करण्याचा प्रक्रियेला विरजण लावणे असे म्हणतात. प्रथम दुध उकळवावे (दहीजास्त घट्ट हवे असल्यास मंद विस्तव करून थोडेसे आटवावे). दुधाला उकळी आल्यावर ते थोडे निवू द्यावे (उन्हाळ्यात कोमट दुधाला विरजण लावावे तर हिवाळ्यात जरा उष्ण दुधाला विरजण लावावे).
त्यानंतर हे दुध २-३ वेळा २ भांड्यात चांगला फेस येईपर्यंत वर खाली करावे (दाक्षिणात्यलोक कॉफी दोन भांड्यात खाली वर करतात तशी). त्यामुळे दुधात ऑक्सीजन चांगला मिसळला जातो (ऑक्सीडायझेशन).
नंतर ज्या भांड्यात दही लावायचे त्यात थोडेसे चांगले दही घेऊन नीट फेटावे. चांगले दही अशा करीता कारण "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी". विरजणासाठीचे दही चांगले असेल तर आणि तरच नव्याने होणारे दही चांगले होऊ शकते.
तसेच ही दही लावण्याची भांडी शक्यतो मातीची, चिनी मातीची (पोर्सेलीन) आणि नाईलाज झाला तरच स्टीलची असावीत. दही हे आम्लधर्मीय असल्याने लोखंड, अल्युमिनीयम, हिंडालियम, जर्मेनीयमच्या भांड्यात लावू नये.
मातीची भांडी सगळ्यात चांगली कारण ती दही बनल्यावर त्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेतात आणि आपल्याला घट्ट दही मिळते.
विरजण लावण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या थोड्याश्या दह्याचे काहीही प्रमाण ठरलेले नाही. कारण ही सर्व प्रमाणे सतत प्रयोग करीत राहिल्याने अनुभवाने कळायला लागतात (ट्रायल अँड एरर).
आता त्या फेटलेल्या दह्यावर जरासे वरूनच निवलेले दुध ओतावे आणि ते विरजणाचे भांडे कोपऱ्यात जिथे कोणाचाही सहसा हात लागणार नाही अश्या ठिकाणी ठेवावे व त्या विरजणाचा भांड्यावर अलगद अर्धवट झाकण (शक्यतो ताटली) घालावे. साधारण पाऊण एक तासाने ते झाकण पूर्ण पणे लावावे.
झाकण लावताना भांड डुचमळू देऊ नये. साधारण ८-१० तासांनी त्या भांड्याचे झाकण काढावे व दही लागले आहे असे वाटले तर त्या भांड्याची कडा एका बाजूने किंचित उचलावी. जर दही अजिबात हलले नाही तर ते चांगले लागले आहे असे समजावे. दही एकसंघ असेल मात्र कडेला पाणी दिसले तर ते अजून एक तासभर तसेच ठेवावे.
मात्र जर कड उचलल्यावर दही द्रवरुपात दिसले तर एका मोठ्या भांड्यात थोडे पाणी गरम करून त्यात ते दह्याचे भांडे अलगद ठेवावे. काही तासांनी दही लागलेले दिसते (हिवाळ्यात बरेचदा असे घडते).
महत्त्वाचे म्हणजे एक प्रयोग फसला तर दु:ख मानून घेऊ नये. अनुभवाने सर्व नीट जमायला लागते.
वि. सू. : दही लावताना इतर वापरासाठीचे दुध दही, दही लावण्याची भांडी ह्यापासून कमीत कमी ३ मीटर वर ठेवावे. शीत यंत्रात सुद्धा दुध दह्याची भांडी जवळ जवळ ठेऊ नयेत. दही लावायला घेण्यापूर्वी हात तसेच दही लावायची भांडे स्वच्छ धुवावीत.
(क्रमश:)
Monday, 7 January 2008

When I was a kid, our teacher told us a story of a little boy who was born and brought up in the city. He was a good kid and a good student too.
But everyday he used to leave some food in his dish। His mother used to explain him that leaving the food in the dish is not a good thing, one must take the food as per his / her need and clean the dish before leaving the dining table but all in vain.
One day his grandfather comes from his native place। And he notices the same but says nothing. On the day of returning to his village, he asks his grandson to come to his village in the forthcoming vacation for a month. The grandson is really delighted with the idea of spending the whole vacation with the Grandfather who never asks him to behave.
Then he goes to the native place and truly he likes the environment over there। The traditional house, loving relatives, stables, the animals, stoned road, fresh cow milk, fragrance of air, the swing, the well and everything attracts him very much.
Then after few days his grandpa asks him to accompany him to his farm which is in the next village। When he reaches the farm early morning, he sees that everyone is working. He feels funny. He asks grandpa what so many people are doing early morning.
The Grandpa says that they are producing wheat। The grandson feels that there is no need to do all these efforts. He says to his Grandpa that why he doesn’t go to nearby retail store and buy the bag of wheat floor. With his innocent question, Grandpa bursts into laugh.
Then Grandpa asks him, “From which factory the wheat floor comes?” which confuses this child very much।
Then Grandpa explains him how wheat is produced with the sweat of hard working farmers who work day and night throughout the year and who does not have vacation in his life।
The 1/4th of bread costs 365 working days of a farmer per year। He shows his grandson the roughness of the hand which comes through enormous labor and rigorous lifestyle of the farmer. He shows the different process that takes place for one peace of bread viz. ploughing, sowing, planting, pruning, manuring, watering, protecting, weeding etc.
After spending one whole day at farm, the boy takes oath never to leave a single grain of food on the dish and to clean the dish before leaving the dining table।
This story and the way our teacher told it to us, made a great impact on life। Many of my classmates changed their eating habits.
Later when I was young, I read a book on Indo-China war which was written by famous author Li। Col. Shyam Chavhan who was imprisoned by Chinese soldiers in 1962. He wrote that at every Chinese army posts there are hens and since Chinese soldiers are mainly rice eaters, whatever the granules of rice are remaining after the meal are ate by these hens and chicks and then these hens are their party food specially on festivals. It happens because Chinese Govt. itself cares about every single grain.
We also must realize that in the world there are people who cannot have food twice a day। Therefore we must also value the food. Also we should not go for the things like unnecessary food wastage in any form. I still remember that once I wrote a letter to the producer of “Lizzy Macquire”, my beloved TV serial which shown food fight (Throwing food on each other) in one of its series.
Also, I found that in Indian marriage ceremony, large quantity food is wasted in city। In village the waste food is given to animals, especially Cows, ox and buffalos. But in city, the extra food prepared by the caterer is simply thrown into garbage on a large scale which is threat to sanitation as well.
We can utilize this food simply by calling 10-9-8 which is a child helpline। This helpline particularly works for street children and the children who are the victim of the abuse and mal treatment. But if we call them, they come to your doorstep and collect the extra food. Many five star hotels are connected to this help line and they are contributing their leftovers with these children.
So if you arranged a party and if there is leftover in a large scale, all you have to do is to dial 1098.