Friday, 9 August 2013

ग्राहक राजा

मुंबईत, हॉटेल व्यवसायावर तुळू लोकांचे अतिक्रमण होण्यापूर्वी, मराठी व इराणी उपाहारगृहांमध्ये ग्राहक सन्माननीय असायचा. इराणी उपाहारगृहांमध्ये तर शिरताच क्षणी हा ग्राहक राजा 'बन-मस्का, मसालानी चा, आजनुं छापु अने पंखो फुल (आजचे वर्तमानपत्र आणि पंखा पूर्ण वेगात)' अशी टेचात आज्ञा सोडायचा. असाच एक कोकणी दर्दी, खवैय्या ग्राहक गिरगावातल्या कोनातल्या एका उपाहारगृहात नियमित यायचा. जाताना प्रत्येक खाल्लेल्या पदार्थाचे विना संकोच विश्लेषण करायचा व न चुकता शेवटी एक वाक्य म्हणायचा - तां तुमचा चा काय गरम नवता हां.... ग्राहकाचा संतोष हेच ध्येय मानणाऱ्या त्या उपाहारगृहाच्या मालकाचा चेहरा कोमेजून जायचा. रोज संध्याकाळी कामगारांची हजेरी मांडताना त्या ग्राहकाला चहा आणून देणाऱ्या वाढप्याचे केस व्यवस्थित भादरले जायचे. मग त्या वाढप्याने संबंधित ग्राहकाला सणसणीत गरम चहा मिळावा म्हणून हर प्रकारे प्रयत्न केले. तो बिचारा दर दिवशी चहा कपात ओतल्याक्षणी धावत चहा आणून द्यायला लागला. पण त्याच्या प्रगतिपुस्तकावरील गार चहाचा लाल शेरा काही चुकला नाही. :( नंतर नंतर त्याला लक्षात यायला लागले की त्या मिश्किल ग्राहकाला गरमागरम चहा पिण्यापेक्षा सुद्धा, जाताना चहाविषयी मत व्यक्त केल्यावर त्या मालकाचा कसनुसा होणारा चेहरा पाहण्यात जास्त स्वारस्य आहे. :) एके दिवशी त्या गुणी वाढप्याने त्या ग्राहकाला गरम चहा देण्यापूर्वी त्या पितळी कपाचा कान सणसणीत तापवला (त्याकाळी उपाहारगृहांमध्ये चहासाठी पितळेचे कप ठेवलेले असत). त्यानंतर त्या चोखंदळ ग्राहकाने कधीही चहाच्या तपमानाची चर्चा केली नाही. :P

Monday, 15 July 2013

केसांचे चाप

मी सात वर्षांची असताना एकदा मी आईने तिच्या मैत्रिणीला दुसऱ्या दिवशी तिचा तिसावा वाढदिवस असल्याचे सांगताना सहजच ऐकले. ते ऐकून मला दोन गोष्टी जाणवल्या – १) माझ्या आईचा पण वाढदिवस असू शकतो हे मला पूर्वी कधीच कळले नव्हते २) मी तिला कधीही वाढदिवसाची भेट स्वीकारताना पाहिले नव्हते. मी नक्कीच ह्या बाबत काहीतरी करू शकत होते. मी माझ्या खोलीत गेले आणि माझी पेटी उघडली. त्यातले सगळे पैसे काढले. ते तब्बल पाच रुपये होते, माझी पाच आठवड्यांची कमाई. नंतर मी कोपऱ्यावरच्या छोट्या दुकानात गेले आणि भिंगार्डेकाकांना मी आईसाठी काहीतरी वाढदिवसाची भेटवस्तू घेऊ इच्छिते असे सांगितले. त्यांनी पाच रुपयांत येतील अशा अनेक गोष्टी दाखवल्या. सुंदर काचेच्या बशीपासून रंगीत खडूपर्यंत सर्व काही. पण आमचे घर त्या सगळ्या वस्तूंनी भरलेले होते आणि आठवड्यातून एकदा मलाच त्या सगळ्या वस्तूंवर फडका मारावा लागे. तिथे एक खाऊच्या गोळ्यांची डबी पण होती पण आईला गोड खायचे नसल्यामुळे ती डबी भेटवस्तू म्हणून अगदीच अयोग्य होती. शेवटची गोष्ट श्री. भिंगार्डे ह्यांनी मला दाखवली ते होते केस कुरळे करायचे केसांचे चाप. माझ्या आईचे केस हे काळे, घनदाट आणि लांबसडक होते. आठवड्यातून दोनदा ती ते केस धुवायची आणि त्यांना केसाचे चाप लावून ठेवायची. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ते चाप काढायची आणि तिचे ते लांबसडक केस जेव्हा तिच्या खांद्याभोवती मोकळे सोडायची तेव्हा ती अगदी एखाद्या प्रसिद्ध नटी प्रमाणे देखणी दिसायची. मला वाटले की हे केसांचे चाप तिच्यासाठी उत्कृष्ट अशी वाढदिवसाची भेटवस्तू ठरेल आणि पाच रुपये देऊन मी ते चाप विकत घेतले. मी घरी आल्यावर ते चाप वर्तमानपत्राच्या रविवारच्या रंगीत पुरवणीत काळजीपूर्वक गुंडाळले (जिलेटिन कागद विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसेच उरले नव्हते). दुसऱ्या दिवशी जेव्हा नाश्त्यासाठी घरचे सारे लोक एकत्र जमले तेव्हा मी हळूच आईकडे गेले आणि तिला ती गुंडाळी दिली आणि म्हटले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! " माझी आई क्षणभर सुन्न होऊन बसून राहिली. नंतर ओल्या डोळ्यांनी तिने ती गुंडाळी उघडायला सुरुवात केली. ज्या वेळेपर्यंत तिच्या हातांत ते चाप आले त्यावेळी ती हुंदके देऊन रडत होती. "आई! मला माफ कर, मला तुला रडवायचे नव्हते, मला केवळ तुझा वाढदिवस आनंदी करायचा होता", मी आईची क्षमा मागितली. "अगं छकुले! मी अतिशय आनंदात आहे गं", माझी आई म्हणाली. तिच्या अश्रू भरल्या डोळ्यांत मला आता आनंद दिसत होता. "का माहीत आहे का, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेली पहिलीच वाढदिवसाची भेटवस्तू आहे", ती पुढे म्हणाली. नंतर तिने माझ्या गालांचा पापा घेतला आणि माझे आभार पण मानले. मग तिने माझ्या बहिणीला म्हटले, "हे बघ तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग तिने माझ्या भावाकडे वळून म्हटले, "हे बघ तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग ती माझ्या बाबांना म्हणाली, "हे बघा तरी, सोनूने माझ्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू आणली". मग ती ते चाप लावून आपले केस कुरळे करण्यासाठी केस धुवायला गेली. ती केस धुवायला जाताच माझे बाबा मला म्हणाले, "सोनू मी ज्या कोंकणातल्या एका छोट्या खेड्यात वाढलो तिथे मोठ्या माणसांचे वाढदिवस साजरे करायची पद्धत नव्हती. केवळ लहान मुलांचेच वाढदिवस साजरे केले जात असत. पण तुझ्या आईचे कुटुंब इतके गरीब होते की ते तेव्हढे पण करू शकत नसत. पण आज तू आईला किती आनंदी केले आहेस ते पाहून मला ह्या वाढदिवस प्रकरणाचा पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. म्हणजे मला म्हणायचे आहे की सोनू तू एक नवा पायंडा पाडला आहेस". मग खरोखरच ही एक प्रथाच पडून गेली. त्यानंतर प्रत्येक वर्षी माझ्या आईवर तिच्या वाढदिवसाला भेटवस्तुंचा वर्षावच होऊ लागला, माझ्या बहिणीकडून, भावाकडून, बाबांकडून व माझ्याकडून. अर्थातच आम्ही जसे जसे मोठे होत गेलो तशी तशी आमची कमाई वाढू लागली आणि तिला मिळणाऱ्या भेटवस्तू अधिकाधिक चांगल्या होऊ लागल्या. मी चोविशीची झाल्यावर तिला रेडियो, रंगीत टी. व्ही. आणि एक मायक्रोव्हेव ओव्हन भेट दिला. तिच्या पन्नाशीला आम्ही भावंडांनी आपली सर्व जमापुंजी एकत्र केली आणि तिच्यासाठी वाढदिवसाची भेट म्हणून एक नेत्रदीपक वस्तू आणली, एक रत्नजडित मोत्याचा हार. जेव्हा माझ्या सर्वांत मोठ्या भावाने तिच्यासाठी आयोजित केलेल्या मेजवानीत आलेल्या सर्व पाहुण्यांसमोर तिच्या हातात ती हाराची पेटी दिली तेव्हा तिने ती पेटी उघडून त्या हाराकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि मग ती उघडलेली पेटी सर्वांना दिसेल अशी धरून ती म्हणाली, "आहेत की नाही माझी मुले अनमोल"? मग तिने ती पेटी सर्वांना पाहण्यासाठी म्हणून पुढे सरकवली. तो हार पाहून प्रत्येकाने टाकलेले उसासे ऐकणे खरोखर रोमांचक होते. सर्व पाहुणे गेल्यावर साफसफाई साठी मी मागे राहिले. मी स्वयंपाकघरात भांडी स्वच्छ करताना पुढल्या खोलीत चाललेला आई-बाबांचा संवाद माझ्या कानावर पडला. बाबा म्हणत होते, "प्रमिला! किती गं महागडा हार आहे हा, मला तर वाटते की तुला मिळालेली ही एक सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहे". त्यापुढची वाक्ये ऐकताना मला भरून आले. आई आपल्या मृदू आवाजात म्हणाली, "खरोखरच हा महागडा हार सुंदरच आहे आणि दुर्मिळ पण. मात्र मला मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट भेटवस्तू आहे, ते केसाचे चाप".
- भावानुवाद - मूळ कथा - – द बॉबी पिन्स – लेखिका - सौ. लिंडा गुडमन.

Thursday, 6 June 2013

प्रार्थना

वेदांमध्ये ऋषी काकुळतीने परमेश्वराकडे प्रार्थना करतात -
हे देवा, आम्हाला सुपथावर ठेव, आमच्या सभोवताली शुभदायी वातावरण असू दे, सर्वत्र मांगल्य असू दे, आम्हाला सदैव प्रसन्नचित्त ठेव, आमच्या चित्तांत सुविचार असू देत आणि वाणीत माधुर्य, आम्ही सदा आनंदी आणि आमचे आयुष्य निरामय असू दे, आमचे जीवन सन्मार्गावरून चालू दे.
पण आपण कितीही सद्विचारांचे असलो तरी दुष्टांच्या दुष्कृत्यांची फळे आपल्याला भोगावीच लागतात. कारण विश्वात आपण सारे एकमेकांशी अदृश्य पाशांनी जखडलेले आहोत. कोणीही स्वतंत्र नाही. दुर्जनांच्या कृत्यांचे परिणाम सज्जनांवर होतच राहातात. दुष्ट लोकांचे मन दुर्बळ असते. आपण चुकीचे वागतो आहोत हे त्यांना कळत नाही असे नाही पण चांगले वागण्यासाठी त्यांच्याकडे मनाची सिद्धता नसते. कित्येकदा मनात असूनही ते चांगले वागू शकत नाहीत. स्वतःचा दुबळेपणा जाणून ते इतर दुष्टांशी जवळीक करतात आणि मग त्यांच्या मनाने कितीही चांगले वागायचे ठरवले तरी त्यांचे दुष्ट मित्र त्यांना चांगुलपणापासून दूर ठेवतात आणि ही दुष्टांची मांदियाळी सज्जनांना जीव नकोसा करून सोडते आणि अखेरीस ही दुराचारी मंडळी स्वतःच्या वागण्याने दुर्गतीला जातात. अश्या परिस्थितीत, ऋषींना जाणवते की केवळ आपण सद्वर्तनी असून उपयोगाचे नाही म्हणून ते अग्नीची प्रार्थना करतात आणि म्हणतात -
मा वः एनः अन्यऽकृतं भुजेम । हे अग्ने, दुसऱ्यांनी केलेल्या दुष्कृत्यांची फळे आम्हाला भोगायला न लागोत.

Tuesday, 4 June 2013

धनुर्धारी

धनुर्धारी ह्या टोपण नावाने लिहिणाऱ्या कै. श्री. रामचंद्र विनायक टिकेकर ह्यांची ‘वाईकर भटजी’ ही कादंबरी सध्या वाचत आहे. कादंबरी तर सुंदर आहेच पण त्याला श्री. अरूण टिकेकरांनी लिहिलेली प्रस्तावना पण अत्यंत रोचक आहे. प्रस्तावनेत धनुर्धारींच्या लेखनप्रवासाचा सविस्तर वृतान्त दिला आहे. 1880 च्या दशकात लिहिलेल्या धनुर्धारींच्या कादंबऱ्यांमध्ये/लेखांमध्ये पेशवाईच्या अस्तानंतर आलेली इंग्रजी शिक्षणाची लाट, इंग्रजी शिकल्याने नव्या पिढींत हातात खुळखुळणारा पैसा, बिघडलेली कुटुंबव्यवस्था, आमिषे दाखवून तसेच हिंदुधर्मावर टीका करून/दिशाभूल करून केली जाणारी तत्कालीन ख्रिस्ती धर्मांतरे असे शहरी विषय तर आहेतच पण मराठ्यांच्या मर्दुमकी, वीरस्नुषा राधाबाई, उमाबाई दाभाडे, अहिल्याबाई होळकरीण, पानपतचा मोहरा, शूर अबला अश्या ऐतिहासिक कादंबऱ्या/लेख पण आहेत तसेच ‘व्यापारी-वाचन-पाठ’, ‘व्यापारी भूगोल (कमर्शियल जॉग्राफी)’, ‘आमची गळितांची धान्ये/उपाशी महाराष्ट्रास उद्योग’, ‘धावता धोटा’ अशी अर्थशास्त्रावरील पुस्तके पण आहेत. श्री. अरूण टिकेकर लिहितात - धनुर्धारींच्या लेखनात स्वजनोद्धाराची तळमळ दिसून येते. त्यातील वाक्ये आजच्या काळातही प्रत्ययकारी वाटतात –
शेतातील राब, गिरण्यातील मजुरी, बाजारातील हमाली आणि मग कापडाच्या खपाची गिऱ्हाईकी एवढीच कामे महाराष्ट्र या कापसाच्या व्यापारात करत आहे. आमच्या ह्या नीचंतर दैनेचे मुख्य कारण अपरिहार्य अशी परदेशी व्यापारउद्योगांची आम्हाबरोबर लागलेली झटापट आणि त्यांच्याशी सामना देण्याला अवश्य असणाऱ्या साधनांची अननुकूलता हेच होय. ज्ञान आणि उद्योग हे सध्याच्या काळी असेच नव्हे तर सर्वदा कल्पवृक्ष होत. परवशतेला ज्ञान आणि दारिद्र्याला उद्योग अमृतसंजीवनी होय.
तसेच (डॉ. आनंद यादव ह्यांनी पहिली ग्रामीण कादंबरी म्हणून मान दिलेल्या) पिराजी पाटील ह्या 1903 साली प्रसिद्ध झालेल्या आपल्या कादंबरीत धनुर्धारी म्हणतात –
महाराष्ट्र देशांत दोन कोटी मनुष्ये आहेत. मराठी भाषा बोलणारे दोन कोटी... उणी अधिक व जवळ जवळ पंचवीस हजार खेडी... गेल्या पाच वर्षांत तीन दुष्काळ कोसळले.. खडतर हाल भोगण्याचा वखत आला आहे! दर शंभर लोकांपैकी नव्वद जण महाराष्ट्रातील खेडेगावांत राहतात. दर शंभर लोकांपैकी ऐंशी पेक्षा जास्त लोक शेतकीवर आपली उपजीविका करून घेत आहेत आणि सध्या या महाराष्ट्रातील यच्चयावत् खेडी मोडकळीस लागली आहेत! महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग धुळीचे दिवे खात उधळत सुटला आहे. त्याची मिराशी जमीन, जिवापेक्षाही प्यार, ती सावकार सारखा बळकावत आहे. त्यांची जनावरे पोटच्या पोरांइतकी लाडकी, ती त्याच्या डोळ्यांदेखत पटापट मरून गेली. सर्व दुःखांची जननी क्षुधा, उपासमार ती त्याला घट्ट मगरमिठी मारून बसली आहे! शेतकरी राष्ट्रांतल्या अन्नाचा पुरवठा करणारा, शेतकरी मिजासी लोकांच्या हौशी पुरवणारा, शेतकरी सरकारचा पाया, शेतकरी राष्ट्राचा आधार, शेतकरी राष्ट्राचा अभिमान, शेतकरी देशाचे सौभाग्य, शेतकरी शहाण्यांचा पोशिंदा आणि तो हा आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी उपासमारीत दिवस काढत आहे...
(मात्र धनुर्धारी केवळ बोरूबहाद्दर नव्हते तर त्यांनी अक्कलकोट संस्थानात शेतकऱ्यांसाठी सिंडीकेट काढली, साधारण 300-400 गायी शेतकऱ्यांत वाटल्या तसेच विणकरांचे धंदे वाचवण्यासाठी सोलापुरात वीव्हर्सगिल्ड स्थापली, धावत्या धोट्याचे माग बनवले आणि जिन्स, बार्शी येथे कापडगिरण्या सुरू केल्या.) तत्कालीन महाराष्ट्रावर छाप पाडणारा हा कार्यकुशल उद्योजक आणि लेखक वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी 1907 मध्ये क्षयाची बाधा होऊन स्वर्गस्थ झाला. धुळीचे दिवे खात जाणें - To beg about in great disgrace and wretchedness. मिराशी - Hereditary.

Thursday, 28 March 2013

लबाड सभ्य

सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो. हे तेच गोपीनाथपंत आहेत जे स्वराज्यावर अफझलखानासारखी विलक्षण धूर्त, कपटी आणि कावेबाज वावटळ आली असताना शिवाजी राजांना ओतप्रोत विश्वासाने म्हणतात, “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ शिवाजीराजे म्हणजे लखलखता हिरा तर त्यांचे सहायक मंत्रीगण म्हणजे जणू सोन्याचे कोंदण. पाहाण्यासारखी गोष्ट आहे की खान राजांच्या मुलुखात आल्यावर साम-दाम-दंड भेदाने राजांची माणसे फोडायचा प्रयत्न करतो. वतनाच्या लोभाने त्याला बळी पडणार्‍यांत मंबाजी भोसले (महाराजांचे चुलत काका), केदारजी व खंडोजी खोपडे, जाधवराव, रविराज ढोणे, शेडगे, धायगुडे, कोकरे, इंगळे, सुलतानजी जगदाळे ह्यांच्यासारखी माणसे आहेत पण गोपीनाथपंत बोकीलांसारखा सामान्य कुलकर्णी मात्र राजांशी एकनिष्ठ राहतो. आज गोपीनाथपंत बोकीलांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही पण सासवड जवळील हिवरे गावाचे जोशी-कुलकर्णीपद ह्यांच्याकडे पूर्वापार चालत आले होते. शिवाय सुपे परगणा आणि कर्यात बारामतिचे देशकुलकर्णी पदाचे वतनही त्यांच्याकडे चालत आलेले असावे. १६४० मध्ये ते पुण्याचे मुजुमदार होते आणि १६५६ पासून राजांचे चिटणीस. ह्या तालेवार, मातब्बर असामीला राजांच्या कुटुंबात एखाद्या ज्येष्ठ माणसाप्रमाणे मान होता. त्यांचा घरोबा होता इतका की सगळे त्यांना काकाच म्हणत, ‘पंताजी काका ह्यांचा मान तो इतका की त्यांनी आऊसाहेबांसोबत सोंगट्या खेळाव्या’ असा त्यांचा उल्लेख आढळतो. राजे पंताना म्हणतात की खानाने बोलणी करताना बेलभंडारा (क्रियाशपथ) मागीतला तरी खुशाल द्यावा. अनमान करू नये. त्या काळात शत्रुचाही ब्राह्मणांच्या सत्यकथनावर विश्वास होता. त्यामुळे शपथेवर खोटे बोलणे पंतांना किती कठीण असेल पण त्यांनी स्वराज्यासाठी तेही केले.खानाने पंताकडून जानव्याची शपथ घेतली. ह्याच कपटी खानाने श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला तहाच्या मिषे बोलावून त्याचा खून केलेला असतो. त्यामुळे अश्या धूर्त, चाणाक्ष व विजयासाठी कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध न बाळगणार्‍या ह्या खानाला आपल्या वाक्पटुतेने जावळी सारख्या कुबल जागी बोलवून आणणे ही पंतांच्या बुद्धिचातुर्याची कमालच म्हणायला हवी. आपल्याकडे विनोदाने म्हणतात की चीनशी भारताच्या वाटाघाटी म्हणजे वाटा त्यांना आणि घाटा आपल्याला. पण पंत इतकी सावध पण लाघवी बोलणी करतात की खानासारखा कसलेला मुत्सद्दी पण पाघळतो आणि सह्याद्री हे मृत्युमुख आहे हे माहित असताना सुद्धा राजांना अपेक्षित अटींवर जावळीत येतो. हे घडणे केवळ पंतांच्या कौटिल्याचे फळ आहे. पंत खानासोबत केवळ वाटाघाटीच करतात असे नाही तर खानाच्या छावणीत राहून खानाचे विचार, त्याचे सैन्य, प्रमुख सेनानी, सैन्यरचना, अश्वदळ, तोफखाना इ. बित्तंबातमी काढतात. म्हणूनच बाबासाहेब पुरंदरे गोपीनाथपंतांना सभ्य लबाड किंवा लबाड सभ्य म्हणतात, वकील असावा तर असाच. पण पंतांचे हे प्रसंगावधान, ही धूर्तता इथेच संपत नाही. खान व राजांच्या भेटीच्या दिवशी गोपीनाथपंत खानाला आणण्यासाठी खानाच्या छावणीत पोहोचले. पाहातात तो खानाने ठरलेल्या अटींना डावलून १५०० हशम सोबत घेतले होते. सुरूवातीला पंतांनी ह्या सैन्याला हरकत घेतली नाही. मात्र खानाचा हा लवाजमा जनीच्या टेंबाच्या पायथ्याशी “खाड्याच्या खोंडात“ आल्याबरोबर पंत काहीतरी अचानक जाणवल्यागत उभे राहिले आणि बोलले, “इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धास्त खाईल. माघारा गडावरी जाईल. भेटी होणार नाही.... शिवाजी म्हणजे काय? त्यास इतका सामान काय करावा?“ खानाचा आता नाईलाज झाला. ह्या तुकडीचे येणे ठरलेल्या अटींच्या विरूद्ध होते हे खरेच आणि परत भेटीची वेळही पुढे पुढे सरकत होती. अश्या रीतीने पंतांनी खानाच्या खास तुकडीला खानापासून वेगळे केले व अडनिड्या जागी आणून ठेवले. परकी मुलुख आणि जावळीसारखे घनदाट, कीर्र जंगल. खानाच्या हत्येनंतर सर्वप्रथम ही तुकडी विनासायास कापली गेली.
अजून एक अतिशय स्तुत्य गोष्ट म्हणजे वृद्ध पंतांना वारंवार खानाच्या भेटीला जावे लागते. थकलेले, वाकलेले काका प्रतापगड १६ कोस हे अंतर कधी पायी तर कधी पालखीतून तर कधी घोड्यावरून करतात. बरं हा मार्ग तरी साधा, सोपा, सरळ आहे का?... तर नाही.एकतर जावळीचे घनदाट जंगल त्यातून अर्ध्या कोसाचा प्रतापगड उतरायचा, दीड कोसाचा महाबळेश्वराचा डोंगर चढायचा, परत दीड कोसाचा पसरणीचा घाट उतरायचा. हे श्रम विलक्षणच म्हणायला हवेत.
ह्यावरून कळते की अफजलखानाच्या ससैन्य विनाशात पंतांची कामगिरी किती महत्त्वाची आहे आणि हे जाणूनच राजांनी पंतांचा विशेष सत्कार केला. त्यांना एक लक्ष (आकडा पुन्हा वाचावा) होन इनाम दिले. त्यांचे राहते गाव मौजे हिरवे तर इनाम दिलेच पण सोबत शिरवळ परगण्यातील मौजे भोळी व मौजे मांडकी येथे प्रत्येकी १ चावर जमीन इनाम दिली. तसेच त्याच शिरवळ परगण्यातील मौजे घरवाडा व मौजे मांडकी येथे सेटेपणाचे वतन इनाम दिले. खरोखरच माणसे निवडून, वेचून, जोडून त्यांच्याकडून ईश्वरी कार्य घडवावे आणि त्या कार्याची दखल घ्यावी ती जाणत्या शिवाजी राजांनीच. असो. गोपीनाथपंतांच्या उत्तरायुष्याबाबत अधिक माहिती मिळत नाही पण वाईमध्ये सर्वात जुना वाडा गोपीनाथ पंत ह्यांचा आहे अशी माहिती महागणपतिवाई ह्या संकेतस्थळावर मिळते. अर्थातच गोपीनाथपंतांसारख्या अनमोल रत्नावर अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे आणि तेही मनात कोणतेही किल्मिष न ठेवता. कारण जोतिबा आपल्या फुले रचनावली २/७७ येथे म्हणतात – हरामखोर गोपीनाथपंतांच्या मदतीने शिवाजीने दगलबाजीने अफजलखानाची हत्या केली. सहाजिकच मनात प्रश्न येतात – १) शिवाजीराजांना “महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो. आपण हिंमत धरोन एकांगे करून खानास मारणे. त्याचे लष्कर साफ लुटणे. राज्य आपले करणे.“ असे आत्मविश्वासाने सांगणारे स्वराज्याशी एकनिष्ठ आणि निबिड अरण्यातून १६ कोस अंतर कापून अनेकदा खानाच्या भेटीला जाणारे आणि हिंदवी स्वराज्यासाठी खानाच्या सैन्याविषयी बित्तंबातमी काढणारे गोपीनाथपंत हरामखोर कसे? 2) श्रीरंगपट्टणचा राजा कस्तुरीरंगन ह्याला आणाशपथा देऊन तहासाठी बोलावून त्याचा खून करणार्‍या अनैतिक, कपटी खानाचा जर शिवाजीराजांनी भेटीला बोलवल्यावर स्वसंरक्षणासाठी जर कोथळा बाहेर काढला तर ती दगलबाजी कशी काय? ३) (प्रेमात आणि) युद्धात सर्व काही क्षम्य असते. मानवाचा वैश्विक स्तरावरील राजकारण व युद्धेतिहास हा धोका, धूर्तता, दगलबाजी, विश्वासघात, गनिमी कावा ह्यांनीच भरलेला आहे. प्रश्न केवळ इतकाच असतो की हे सर्व करणार्‍याचा अंतर्हेतु काय आहे. शिवाजीराजांचे राज्य हे लोककल्याणासाठीच होते हे जोतिबांना ठाऊक नव्हते का? ४) केवळ विशिष्ट जमातीविषयी द्वेष मनात ठेऊन पूर्वग्रहदूषित, एकांगी इतिहासलेखन करणे म्हणजे सत्यशोधन होते का? . . . . संदर्भग्रंथ :– वेध महामानवाचा – लेखक - डॉ. श्रीनिवास सामंत राजा शिवछत्रपति - लेखक – ब. मो. पुरंदरे

Wednesday, 30 January 2013

शिवराजाभिषेक

काल रायगडी अप्पांसोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्रात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' असे असताना बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. -------------------------------------------------------------------------- राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल. संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.

Saturday, 8 September 2012

A fantastic day in lush greenery....


Few years back, I was working as a teacher in a school. Often, on my way to the staff-room, I used to see many students punished for indiscipline out side the drawing room. I made a note that whoever is that drawing teacher, s/he must be very strict kind of person. But since that teacher is from higher secondary section, I did not know him/her personally. Few months later, I acquitted with that drawing teacher whose name is Mr. Sadashiv Kulkarni, a very kind hearted, witty, and pun loving personality.


Shri. Sadashiv Kulkarni


Unlike most of the teachers who are interested in spying, gossiping, mud-slinging, his interest was in inculcating the love about his subject in students. His tagline was “Respect my subject”. (Unfortunately, we Indians developed an ear for the music but not the eyes for great paintings, drawings, and sculptures. And we give weight-age to scoring subjects more rather than grading subjects in school life.)

Though his company was a sheer pleasure, we were not in contact much due to my hectic teaching schedule in those days. And later, I left the school and continued with my own business.

However, few months back, he added me to his Facebook a/c and I started sharing magnificent artistic pieces posted on his wall.

And then, one fine day, he announced a drawing and painting tour to Vasai Fort and there was no criterion. It was an open invitation to all those who love nature, colours irrespective of that person’s ability to draw.

Fort Vasai


On 26th August, 2012, along with my aunt and a cousin, I joined that tour. Since after my school days, I hardly was in touch with drawing and painting, my idea was to enjoy the tour merely as a picnic. At 7.00 am, we left Thane. There were total 17 people, many of them were known faculty of (World-famous) J.J. School of art and yet were far from ego-ism. The atmosphere was full of kindness and affection.

On the way, there was introduction session and I came to know that most of the painters are specialized in various drawing and painting skills like Charcoal Drawing, oil painting, fabric painting, wax painting, sketching etc. and have painted pictures worth in crores. It was a nice feeling to be in company of gifted artists like Anant Kulkarni, Dr. Bal Bendakhale, Shreekant Chougule, Shreekant Jadhav, Sadashiv Kulkarni, Yeshwant Patil, Vijayraj Bodhankar and so on.

We reach Vasai in an hour and had delicious breakfast and continued our journey to the Fort. After reaching the fort, firstly we met officers of Archaeological Department of Govt. of India and intimated them our interest of visiting the fort and they were delighted by hearing our purpose.  


Then Mr. Bal Bendkhade enlightened us the history of the fort and its impact on the designing of the fort. After wandering the fort for say 15 minutes we stopped at a spot where numbers of good structures were present. Everyone chose the spot and tools of own liking, and started working on the canvas. 




Artists at work
Shri. Bal Bendkhale

Gautam Choughule

Shri. Vijayraj Bodhankar

Damle Duo (Sr. and Jr.)

Shri. Shrikant Choughule


I opted for pencil sketching.

My drawing


Occasionally, I was serving mini-burgers to the participants.

At 1.00 pm, we revisited the Vasai village, had lunch and then we return to the fort and chose another suitable spot. While some of us continued their creativity, we continued our activity.


Shri. Vijayraj Bodhankar

Shri. Shreekant Jadhav Sir and Shri. Anant Kulkarni Sir

Shri. Yeshwant Patil Sir

The Bus Driver inspired by our activity.




At 5.00 pm we gathered together, Mr. Sadashiv Kulkarni told us about his organization Kalasparsh which is dedicated to art and innovation, the history of this painting tour. Then we exhibited our work till now, decided about next tour (which will be announced in coming days), had a special journey via Hiranandani and Brahmand for “Nectar like Tea” in heavy rain and came back to Thane at 7.00 pm.
  

It was a breathtaking experience in the company of splendid people. And the greenery, insect-life and the diversity of trees at Vasai fort was amazing. After 6 days of work in an artificial atmosphere, sitting next to computer 8 hours a day with strained eyes, this experience with rich oxygen, was incredible.

   









Picture courtesy - Ms. Anuradha Damle, Mr. Sadashiv Kulkarni and the internet.