Thursday 15 July 2010

शाळेत असताना आम्ही म्हणत असू ते समूहगीत...

भारतमाता परमवंद्य धरा, मायभू अमुची, कोटी बांधव हे आम्ही ।
आणूनिया पावन सूर सरिता श्रम गंगा म्लानमुखी स्मित कमळे फुलवू ।।
विविध जरी भाषा, भिन्न धर्म दिशा, प्रगति पंथ तरी एक असे ।
येऊ दे अंधार वा वादळी असू दे हवा, चाललो ध्येयाकडे....
मातेसाठी सर्वस्वाचे बलिदान करू ।।
सळसळत्या सोनेरी शेतातूनी कसणार्‍या बाहूंची संजीवनी ।
अमुच्या कामातूनी, घामातूनी, रक्तातूनी, निपजो सुजल धरा, सुफल धरा ।।
निजशक्तिविण आम्हा आधार दुजा नाही ।
अमुच्याच प्रयत्नांची आम्हांस खरी ग्वाही,
मातेसाठी सर्वस्वाचे बलिदान करू ।।

- कवि अज्ञात आहेत. कोणाला ठाऊक असल्यास कळवावे.

No comments:

Post a Comment