Showing posts with label समूहगीत. Show all posts
Showing posts with label समूहगीत. Show all posts

Thursday, 15 July 2010

शाळेत असताना आम्ही म्हणत असू ते समूहगीत...

भारतमाता परमवंद्य धरा, मायभू अमुची, कोटी बांधव हे आम्ही ।
आणूनिया पावन सूर सरिता श्रम गंगा म्लानमुखी स्मित कमळे फुलवू ।।
विविध जरी भाषा, भिन्न धर्म दिशा, प्रगति पंथ तरी एक असे ।
येऊ दे अंधार वा वादळी असू दे हवा, चाललो ध्येयाकडे....
मातेसाठी सर्वस्वाचे बलिदान करू ।।
सळसळत्या सोनेरी शेतातूनी कसणार्‍या बाहूंची संजीवनी ।
अमुच्या कामातूनी, घामातूनी, रक्तातूनी, निपजो सुजल धरा, सुफल धरा ।।
निजशक्तिविण आम्हा आधार दुजा नाही ।
अमुच्याच प्रयत्नांची आम्हांस खरी ग्वाही,
मातेसाठी सर्वस्वाचे बलिदान करू ।।

- कवि अज्ञात आहेत. कोणाला ठाऊक असल्यास कळवावे.