Thursday, 11 June 2009

माहिती द्या

मी लहान असताना माझ्या बाबांनी आमच्या घरात टेलिफोन आणला. आमच्या आळीत आलेला तो पहिलाच टेलिफोन होय. मला अजूनही भिंतीवर लटकवलेले ते सुरेखसे चकाकणारे टेलिफोनचे यंत्र आठवते. एक लखलखीत झळाळता रिसीव्हर त्या चौकोनी यंत्राशेजारी लटकत असे. मी इतका लहान होतो की माझा हातच तिथपर्यंत पोहोचत नसे. पण मी आई त्यात बोलत असताना भारावल्यासारखा ऐकत असे.

एके दिवशी मला अनपेक्षितपणे शोध लागला - की त्या अद्भूत यंत्रात कोणीतरी एक आश्चर्यजनक व्यक्ती राहते. तिचे नाव होते "माहिती द्या" आणि तिला माहित नव्हते असे ह्या जगात काहीच नव्हते. ती कोणाचाही फोन नंबर देऊ शकत असे आणि कधीही बिनचुक वेळ सांगू शकत असे.

एकदा माझी आई शेजार्‍यांकडे गेली असता अचानकपणे माझा संबंध ह्या जादुच्या दिव्यातील परीशी आला. तळघरात हत्यारांशी खेळताना चुकून माझ्या बोटावर माझ्याच हातून हातोडी बसली. खरेतर वेदनेने अगदी कळवळायला झाले पण रडत बसण्यात काहीच अर्थ नव्हता कारण माझे डोळे पुसायला (सांत्वन करायला) घरात कोणीच नव्हते.

माझे ठुसठुसणारे, दुखरे बोट चोखत घरभर फिरताना अखेर मी जिन्यापाशी - टेलिफोनपाशी आलो !

मी तडक देवघरातील चौरंग आणायला धावलो आणि तो चौरंग ढकलत टेलिफोनखाली आणला. त्यावर चढून मी रिसीव्हर काढला व कानाला लावत म्हणालो, "माहिती द्या".

एक दोन बटने दाबली गेल्याचा आवाज आला आणि एक किनरा पण सुस्पष्ट आवाज ऐकू आला, "माहिती घ्या". "माझे बोट दुखत आहे" - मी हुंदके देत म्हणालो. ऐकणारे कोणीतरी असल्यामुळे डोळ्यातून लगेच अश्रु बाहेर पडायला लागले.

"तुझी आई घरात नाही का?" प्रश्न आला.
"घरात मी एकटाच आहे", मी रुद्ध कंठाने म्हणालो.
"बोटातून रक्त येत आहे का?"
"नाही", मी उत्तरलो, "माझ्या बोटावर चुकून हातोडी बसली आणि आता खूप दुखत आहे."
"तू फ्रिझ उघडून बर्फ काढू शकतोस का?", तिने विचारले. "हो"
"मग एक बर्फाचा तुकडा त्या दुखर्‍या बोटावर दाबून ठेव", ती म्हणाली.

त्यानंतर मी नेहेमीच सगळ्या काही गोष्टींसाठी "माहिती द्या" ला फोन करायला लागलो. मी तिला भूगोलाविषयी विचारले आणि तिने मला अरुणाचल कुठे आहे ते सांगितले, मी तिला गणिताविषयी विचारले. तिने मला मी नुकतीच बागेत पकडलेली खार फळे आणि शेंगदाणे खाते हे पण सांगितले.

मग एके दिवशी माझी आवडती पाळीव मैना गेली. मी "माहिती द्या" ला फोन करून ही दु:खद गोष्ट सांगितली. तिने ती गोष्ट शांतपणे संपूर्ण ऐकली व मोठी माणसे लहान मुलाची समजुत घालण्यासाठी जे काही बोलतात त्या पद्धतीचे ती बरेच काहीतरी म्हणाली.

पण माझे समाधान काही होईना. 'त्या सुस्वर आणि आमच्या सर्व कुटुंबाला आनंद देणार्‍या आकर्षक पक्षिणीचा असा दु:खद अंत का व्हावा? का तिने असे पिसे झडलेल्या अवस्थेत पाय वर करून पडावे?'

तिला माझ्या दु:खाचे गांभीर्य जाणवले असावे. ती पटकन म्हणाली, "पिंटू, लक्षात ठेव, इतरही अनेक जगे आहेत जिथे गाणे म्हणण्याची आवश्यकता आहे". मला आत कुठेतरी बरे वाटले.

नंतर एकदा मी फोन उचलून म्हणालो, "माहिती द्या" आणि आता तो ओळखीचा झालेला आवाज म्हणाला, "माहिती घ्या". मी विचारले, "स्टेशन शब्द इंग्रजीत कसा लिहायचा?".

हे सर्व घडले भारताच्या पूर्वेला एका छोट्याश्या शहरात. मग मी ९ वर्षांचा असताना आम्ही सुरतेला राहायला गेलो. मी खरोखरच माझ्या प्रिय मैत्रिणीला मुकलो. "माहिती द्या" केवळ त्याच जुन्या टेलिफोन यंत्रात राहात होती. सुरतेत आल्यावर कधीही चुकूनसुद्धा माझ्या मनात आमच्या दिवाणखान्यातील टेबलावर विराजमान झालेल्या नव्या टेलिफोनचा वापर करावा असे आले नाही.

पुढे जरी मी तारुण्यात प्रवेश केला तरीही मी त्या सुखद संवादाच्या मोहक आठवणी कधीही विसरू शकलो नाही. गोंधळलेल्या आणि शंकाकुल मनस्थितीत नेहेमी मला त्या प्रसन्न सुरक्षित करणार्‍या संभाषणाची आठवण येत असे. मला आता जाणवत होते की एखाद्या लहान मुलाच्या निरागस पण बालिश शंकांना उत्तरे देण्यासाठी वेळ देताना ती किती संयत, समजुतदार आणि प्रेमळ असणे गरजेचे होते ते.
नंतर काही वर्षांनी गुवाहाटीला उच्च शिक्षणासाठी जाताना मला कोलकत्याच्या विमानतळावर १५-२० मिनिटे थांबण्याची वेळ आली. मग मी सध्या तिथे राहात असलेल्या माझ्या बहिणीशी गप्पा मारल्या आणि तो फोन संपल्यावर नकळत पुन्हा फोन उचलून विचार न करता सहज म्हणालो, "माहिती द्या".

१-२ दा बटणे दाबली गेल्याचा आवाज आला आणि चमत्कार घडला, मी तोच ओळखीचा किनरा पण सुस्पष्ट आवाज पुन्हा ऐकला - "माहिती घ्या". मी काही ठरवले नव्हते पण सहज माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, "स्टेशन शब्द इंग्रजीत कसा लिहायचा?"

२ मिनिटे नि:शब्द शांततेत गेले आणि मृदु आवाजात उत्तर ऐकू आले, "एव्हाना तुझे दुखरे बोट बरे झाले असेल ना..."

मला हसू फुटले. "म्हणजे ती तूच आहेस अजूनही", मी म्हणालो, "तुला काही कल्पना आहे का तुझे माझ्याशी बोलणे हे त्या काळात माझ्यासाठी किती महत्त्वाचे होते ते?"

"तुला काही कल्पना आहे का?" ती म्हणाली, "तुझे माझ्याशी बोलणे हे त्या काळात माझ्यासाठी किती खास होते ते? मला कधीच मुलबाळ झाले नाही. मी आतुरतेने तुझ्या फोनची वाट पाहात असे." मी तिला सांगितले की कशी वारंवार मला तिची आठवण येत असे आणि मी तिला गहिवरून विचारले की परत कोलकत्याला येईन तेव्हा मी तिला फोन करू शकतो का?

ती म्हणाली, "जरूर कर आणि मी नसले तर सरोजिनी आहे का ते विचार". नंतर ३ महिन्यांनी मी काही कामानिमित्त कोलकत्याला परत आलो, ह्या वेळी एक वेगळाच आवाज माहिती देण्यासाठी पुढे आला. मी सरोजिनी आहे का असे विचारले.

"तू तिचा मित्र आहेस का?"
"हो, अगदी जुना मित्र".
"मला सांगायला वाईट वाटते पण सरोजिनी गेले काही महिने आजारपणामुळे आमच्याकडे अर्धवेळ नोकरी करीत होती. ती गेल्या महिन्यात वारली".

मी फोन ठेवणारच होतो पण तो आवाज म्हणाला, "एक मिनिट, तुझे नाव पिंटू आहे का?" मी हो म्हटले.

"असे असेल तर तुझ्यासाठी एक निरोप आहे. सरोजिनीने तो लिहून ठेवला आहे. मी वाचून दाखवते - त्याला सांगा, पिंटू, लक्षात ठेव, इतरही अनेक जगे आहेत जिथे गाणे म्हणण्याची आवश्यकता आहे. मला काय म्हणायचे ते त्याला नक्की कळेल".

मी तिचे आभार मानून फोन ठेवला. मला नक्कीच माहित होते की सरोजिनीला काय म्हणायचे होते ते.
___________________________________________________________________

मी जरी अनुवाद क्षेत्राशी संबंधित असले तरी आता पावेतो कधीही मराठी ललित साहित्याचा अनुवाद केलेला नव्हता. मात्र आज एक प्रयोग म्हणून एक अग्रप्रेषित हृद्य लघुकथा अनुवादित करत आहे. हा अनुवाद करताना थोडेसे स्थानिकीकरणाचे स्वातंत्र्य सुद्धा घेतले आहे. मूळ कथा इथे वाचता येईल. आपल्यापैकी कोणालाही जमले तर मी दिलेली कथा शब्दरचना, विशेषनामे आपल्या कल्पनेप्रमाणे, आवडीप्रमाणे बदलून इथे प्रतिसादात संपूर्ण घालावी व चांगला अनुवाद कसा करता येईल ह्याचा वस्तुपाठ घालून द्यावा ही विनंती.

Tuesday, 2 June 2009

नृशंस


माझे वडिल इझ्रायल प्रेमी असल्याकारणाने आमच्या घरात सर्वांत जास्त पुस्तके इझ्रायल, ज्यू, ज्यू तत्वज्ञान, दुसरे महायुद्ध ह्या संदर्भात होती. ना.ह. पालकरांचे "इझ्रायल, छळाकडून बळाकडे" मी अनेकदा वाचले. त्यावेळी मला दोन गोष्टींचा प्रचंड अभिमान वाटत असे - १) जगाच्या पाठीवर भारत हा असा एकच देश आहे जिथे ज्यू धर्मीयांचा केवळ ते ज्यू आहेत ह्या एका गोष्टीमुळे छळ झाला नाही. २) ना.ह. पालकरांच्या लिखाणाची दखल घेऊन त्यांना अभिवादन म्हणून इझ्रायलमध्ये एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले (लक्षात घ्या की इझ्रायल हा एक आकारमानाने महाराष्ट्राच्या १/३ देश आहे).


त्यानंतर वि. ग. कानेटकरांचे "इझ्रायल, युद्ध, युद्ध आणि युद्धच" हे पुस्तक वाचले. इझ्रायल सारखे एक चिमुकले राष्ट्र जन्मल्याक्षणी सहा क्रुर व खुनशी इस्लामी शेजार्‍यांशी कसा लढा देते व पुढे पण वेळोवेळी अतुट राष्ट्रनिष्ठा, विजिगिषु वृत्ती आणि योग्य राजकीय डावपेच ह्यांच्या जोरावर ते कसे सततच्या लढाया जिंकत जाते ते मूळातूनच वाचण्याजोगे आहे.

मी अनेकदा पाहते की लोक म्हणतात की अमेरिकेचा पाठिंबा होता म्हणून इझ्रायल तगले. पण इझ्रायल जरी अमेरिकेचे सहाय घेत असले तरी ते एक व्यापाराचा भाग म्हणून. त्यात कोणताही मिंधेपणा नाही. अनेकदा इझ्रायलने अमेरिकेला न पटणारे निर्णय घेतलेला आहेत. प्रत्येक इझ्रायली परराष्ट्रमंत्र्याने अमेरिकेला बजावले आहे की इझ्रायलला अमेरिकेची गरज नसून अमेरिकेला शीतयुद्धात मध्यपूर्वेत गैर-इस्लामिक सहयोगी म्हणून इझ्रायलची गरज आहे व अमेरिकेची अर्थव्यवस्था ज्यू धनिकांच्या हातात आहे.

तसेच केवळ अमेरिकेच्या पाठिंब्यावर जर कोणतेही राष्ट्र सशक्त बनू शकते असे जर कोणाला म्हणायचे असेल तर त्यांनी आज पाकिस्तानची अवस्था पाहावी. असो.

पुढे पुढे, इ. ९-१० मध्ये असताना इंग्रजी पुस्तके वाचायची सवय लागली. एनिड ब्लिटन, एरिक क्येस्तनर वैगरेंची पुस्तके वाचता वाचता लिऑन युरिसचा "एक्सोडस" हा पहिलाच मोठा ग्रंथ वाचला. खरेतर ती एक सुरस कादंबरी आहे. मात्र त्यातील प्रसंग हे सत्य घटनेवर आधारित आहेत. कादंबरी वाचत गेले आणि मला तिचे वेडच लागले. तिचे इतके वेळा पारायण केले की कित्येक उतारे तोंडपाठ झाले. सुरवातीला इंग्रजी शब्दांचे अर्थ संदर्भाने कळायचे. मग मी एकदा न कळलेले शब्द लिहून काढायचा व शब्दकोशात त्याचा अर्थ शोधायचा व मग पुन्हा एकदा तो उतारा वाचायचा असे चालू केले. मग ही कादंबरी पुन्हा नवी होऊन समोर आली.

विशेषत: ऑश्विट्झ, ट्रेबलिंका, बिर्केनाऊ वै. ची वर्णने वाचून अंगावर काटा उभा राहिला. युरोप आणि रशियातून ज्यूंचा समूळ नि:पात करायचा ह्या वेड्या विचारांपायी ज्या क्रुरतेने ६० लाख ज्यूंची ह्या छळछावण्यातून निर्मम हत्या करण्यात आली ती वर्णने वाचवत नाहीत. त्यातूनही जे बचावले त्यांची, विशेषत: मुलांची शारीरिक व त्याहीपेक्षा जास्त मानसिक अवस्था पाहून मन विदीर्ण होते.




आज हे सर्व आठवायचे कारण की भारतात सध्या हिस्टरी वाहिनीवर आश्विट्झ विषयी विशेष मालिका चालू आहे. ती पाहिल्यावर मनाला प्रश्न पडतो की कोणाचीही एखाद्या गोष्टीबद्दल, समाजाबद्दल इतकी टोकाची मते कशी काय बनू शकतात? मात्र जर समाजातील काहींची अशी मते बनली तरी त्यांच्या अमानवी आज्ञांचे पालन समाजातील इतर माणसे उदा. आईखमन, डॉ. योसेफ मिंगेल इ. कशी काय करू शकतात?


एखादा डेन्मार्क सारखा देश सोडला तर सरसकट सर्व युरोपीय देश ह्या ज्यूंच्या कत्तलीकडे डोळेझाक करतात किंवा स्वत:ला सुरक्षित ठेवण्याकरता स्वत:हून आपल्या देशातील ज्यूंना जर्मनांच्या ताब्यात देतात. जणू काही ज्यूंचे शिरकाण ही त्यांची स्वत:चीच इच्छा जर्मन गेस्टापो पूर्ण करीत असते. उदा. रशियामध्ये अनेक शतके ज्यूंच्या कत्तली (पोग्रोम) उघड चालू होत्या. रस्त्यात चालणार्‍या एकट्या दुकट्या ज्यूंना ठार मारणे हा काहींचा छंद होता. रशियन सरकारच अश्या गोष्टींना सतत प्रोत्साहन देत असे.
पुढे ऑश्विट्झ सारख्या छळ छावण्या झाल्यावर गाड्या भरभरून ज्यू संपूर्ण युरोप आणि रशियातून आणण्यात आले. फार कमी सहृदय लोकांनी ह्या काळात ज्यूंना आश्रय व रसद दिली. पोलंडसारख्या देशात तर दुसरे महायुद्ध संपल्यावर जे दुर्दैवी ज्यू छळ छावण्यांमधून कसेबसे वाचून परत आपल्या घरी परतायचे ह्या विचारांनी परत येताना दिसले त्यांना पोलिश लोकांनी प्रचंड विरोध केला. हे सर्व समाजशास्त्राच्या दृष्टीने अनाकलनीय आहे.

Thursday, 23 April 2009

कोकण प्रवास

माझे कोकणात पूर्वी बरेचदा येणे जाणे असल्याने प्रवासाच्या दृष्टिने माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या. त्या इथे नमुद करू इच्छिते.

१) कोकण रेल्वे - हिचे नाव बदलून गोवा - मंगळूर रेल्वे करायला हरकत नाही. कारण गाड्यांना कोकणात थांबे कमी. बर्‍याच स्थानकांवर गाड्या थांबत नाही. काही ठिकाणी तर किमान राजापुर सारख्या महत्त्वांच्या स्थानकांवर तरी ही रेल्वे थांबवावी म्हणून लोकांना आंदोलने करावी लागली. मुख्य महसूल गोवा आणि पुढच्या भागातील स्थानकांवर उतरणार्‍या प्रवाशांकडून. २) एकच रुळ असल्या कारणाने लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य. बरेचदा गाड्यांच्या वेळापत्रकात गडबड झाली की लहान अंतरावर जाणार्‍या गाड्यांना बाजूला ठेऊन लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुढे काढले जाते. ३) भुसभुशीत जमीन पोतामुळे दरडी कोसळणे, रुळावरून गाडी घसरणे इ. प्रकार घडतात (विशेषत: पावसाळ्यात). ४) बरीचशी स्थानके मूळ गावापासून बरीच लांब. त्यामुळे रेल्वे तिकिट दर कमी असले तरी पुढे रिक्षाने त्याच्या २-३ पट पैसे टाकून आपल्या गावाला जाणे म्हणजे पैशाचा अपव्यव तर होतोच पण रिक्षा मिळाली नाही तर टेम्पो वैगरेने किमान महामार्गाने तरी कसबसे यावे लागते. मगच पुढचे वाहन मिळू शकते. उदा. आमच्या गावाला जर जायचे असेल तर आडवली ह्या स्थानकावर (इथे कोकण रेल्वेच्या काही मोजक्याच गाड्या थांबतात) उतरून (रु. १००) रिक्षाने किंवा टेम्पोने लांज्यापर्यंत (रु. १००) आणि मग एस्टीने किंवा ती मिळाली नाही तर पुन्हा स्थानिक रिक्षाने (रु. १००) गावापर्यंत पोहोचावे लागते. ५) सुट्ट्यांच्या दिवसात आरक्षण मिळणे कठिण. आरक्षण असले तरी बरेचदा गाडीत इतकी प्रचंड गर्दी असते की जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. असो.

दुसरा पर्याय खुष्कीच्या मार्गाचा - बरेच जण स्वत:च्या वाहनाने कोकणात जातात. मात्र सार्वजनिक वाहतुकीने जायचे असेल तर एस्टीने जाणे सर्वाधिक सुरक्षित. कारण प्रशिक्षित चालक आणि बस पंक्चर (मराठी?) झाली तर तातडीने जवळपासच्या आगारातून दुसर्‍या बसची सोय केली जाते. तिसरे महत्त्वाचे म्हणजे चालकांना दारू पिण्यास मनाई आहे. तसेच एस्टी ठरल्या वेळेला निघते. प्रवासी (सीटा) भरेपर्यंत खोळंबा करत नाही. तसेच एस्टिचे जाळे सर्वदूर पसरले आहे. एका ठिकाणी गेले किदुसर्‍या ठिकाणी जावयाची एस्टी संबद्ध (Connected) एस्टी त्याच आगारात मिळू शकते. आम्ही आजही कोकणात जाताना लाल रंगाच्या / एशियाड एस्टीने जाणे पसंद करतो. पण चांगल्या स्वच्छतागृहांचा अभाव हे मात्र एस्टी प्रवास टाळण्यास कारणीभूत ठरू शकते.

कोकणात खाजगी ट्रॅव्हलर्सच्या व्होल्व्हो वाहतुकीने जाणे हे मात्र एक दिव्य आहे. १) गाड्या बेदम हाणणे. वेगाची ऐशी तैशी. १ दिवसात एकच वाहन चालक एकाच गाडीला सहज ६००-७०० कि.मी.चा प्रवास घडवतो. २) अशिक्षित चालक ३) व्यसनी चालक ४) बसमधील प्रत्येक सीट भरेपर्यंत जागोजागी गाडी थांबवणे. ५) नंतर वाट्टेल तशी गाडी हाणून वेळेची भरपाई करणे. ६) गाड्या केवळ महागड्या धाब्यांवरच थांबवणे जिथे अनेकदा जेवण शिळे, बेचव असते किंवा उपलब्ध नसते. ७) अपघात झाला तर प्रवाश्यांसाठी विमा संरक्षण नसणे. ८) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे. ९) प्रवाश्यांशी दादागिरी / पैशावरून भांडणे. १०) ह्या खाजगी गाड्या अनेकदा भंगारातून सेकंडहँड घेतलेल्या असतात. त्यांची पुरेशी देखभाल केलेली नसते. ११) टुकार मराठी चित्रपट भसाड्या आवाजात लावणे.

तिसरा मुद्दा येतो तो महामार्ग १७ वरील रस्त्यांची स्थिती आणि वाहतुक खोळंबा (Traffic Jam) ह्यांचा.
सध्या कोकणातील मुख्य रस्ते नारायणकृपेने चांगले झाले आहेत. मात्र अनेक ठिकाणी ते रुंदीला कमी आहेत. वडखळ नाका वैगरे अशी ठिकाणे आहेत जिथे हमखास वाहतुक खोळंबा होतोच होतो. तसेच घाटात अशिक्षित चालकांमुळे / डुलकी लागल्यामुळे होणारे अपघात, खाजगी वाहतुकदारांच्या बेफाम गाड्या हाकण्यामुळे होणारे अपघात, पावसाळ्यात रस्ते निसरडे झाल्याने अपघात अश्या अनेक कारणामुळे अनेकदा प्रवास ५-६ तास विलंबाने होतो. जो प्रवास एर्‍हवी ८ तासांत होतो त्याला कधीकधी १४-१६ तास सुद्धा लागतात. तसेच पावसाळ्यात कित्येकदा पूर येतात. प्रवास अधिकच अवघड ठरतो.
ह्या सर्व गोष्टींना चांगला पर्याय हा जलवाहातुकीचा ठरू शकतो. कोकणातील मुख्य बंदरांचा सर्वांगीण विकास करणे त्यासाठी महत्त्वाचे ठरेल. १) गाळ काढणे २) व्यावसायिक जेट्टी बांधणे ३) संबद्ध वाहतुकीचा योग्य पर्याय ठेवणे. उदा. गेटवेला अलिबाग तिकिट काढले तर रेवस पर्यंत बोटीने प्रवास करावा लागतो आणि तिच बोट कंपनी पुढे त्याच तिकिटात अलिबाग पर्यंत आपल्या बसने लगेच नेऊन सोडते. ४) वेगवेगळ्या प्रकारची वाहतुक उपलब्ध करणे उदा. सामान्य, जलद, ऐषो-आरामी इ. तसेच वेगवेगळ्या प्रवासी आणि पर्यटन योजना जाहीर करणे. ५) व्यापारी वाहतुकीसाठी गोद्या बांधणे.

ह्या पर्यायामुळे कोकणचा सर्वांगीण विकास होईल ह्यात शंका नाही मात्र त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी. (क्रमश:)

Tuesday, 24 February 2009

WHY NEWTON COMMITTED SUICIDE???


Here is the reason. Once, Newton came to India and watched a few Tamil movies that had his head spinning. He was convinced that all his logic and laws in physics were just a huge pile of junk and apologized for everything he had done.

In the movie of Rajanikanth, Newton was confused to such an extent that he went paranoid.
Here are a few scenes :
1) Rajanikanth has a Brain Tumor which, according to the doctors can't be cured and his death is imminent. In one of the fights, our great Rajanikanth is shot in the head. To everybody's surprise, the bullet passes through his ears taking away the tumor along with it and he is cured! Long Live Rajanikanth!
2) In another movie, Rajanikanth is confronted with 3 gangsters. Rajanikanth has a gun but unfortunately only one bullet and a knife. Guess, what he does? He throws the knife at the middle gangster? & shoots the bullet towards the knife. The knife cuts the bullet into 2 pieces, which kills both the gangsters on each side of the middle gangster & the knife kills the middle one.
3) Rajanikanth is chased by a gangster. Rajanikanth has a revolver but no bullets in it. Guess what he does. Nah? Not even in your remotest imaginations. He waits for the gangster to shoot. As soon as the gangster shoots, Rajanikanth opens the bullet compartment of his revolver and catches the bullet. Then, he closes the bullet compartment and fires his gun.
Bang...the gangster dies... This was too much for our Newton to take! He was completely shaken and decided to go back. But he happened to see another movie for one last time, and thought that at least one movie would follow his theory of physics. The whole movie goes fine and Newton is happy that all in the world hasn't changed. Oops, not so fast!

The 'climax' finally arrives. Rajanikanth gets to know that the villain is on the other side of a very high wall. So high that Rajanikanth can't jump even if he tries like one of those superman techniques that our heroes normally use.
Rajanikanth has to desperately kill the villain because it's the climax. (Big brother Newton is smiling since it is virtually impossible?)


Rajanikanth suddenly pulls two guns from his pockets. He throws one gun in the air and when the gun has reached above the height of the wall, he uses the second gun and shoots at the trigger of the first gun in air. The first gun fires off and the villain is dead. Newton Commits Suicide!!!!!!!!!!

Situation 1

There was a criminal called `Raju’ who was suffering a rigorous imprisonment for 10 years in a jail. Before the eighth year of his imprisonment he escaped from the jail and in order to avoid police he had gone to a tiny village in an adjacent state and started living there in a hope that nobody will recognize him.

He started a small business there. Gradually his business flourished and in a few years he was well-known as a successful businessman. He used to help the village people financially, used to give advises to the people, used to give decisions in small disputes and he also built a temple in the village.

One day a newly married bride called Jayashree comes to this village. She is a simple lady, straightforward, hard-working and kind. She becomes the gem of her family.

One fine day she sees Raju and recognizes him as a escaped criminal. She couldn’t sleep for the next three days due to her conscience ….. One moment she feels that as he became a good person she should not go to police and other moment she feels that as an alert citizen its her duty to tell the police that this is the one who escaped from the jail. Now suppose that you are that Jayashree. What you would have done….. What will be your decision and why? Explain it in few words.

Original post and must read comments : Situation 1

Born to live...


Don't go the way life takes you. Take the life the way you go. And remember, you are born to live and not living because you are born.



Original post : Born to live !!!

Raju and Jayashree

Reference: My second last blog `Situation 1’.

When I was doing B.Ed. one day our teacher suddenly presented this situation to us and asked our opinions on it. As we were 100 students, nearly 40-50 students gave their opinions. Few of us asked the teacher her own opinion. And other students remained silent.

The situation given here is called dilemma situation. It is to be given in the classroom and students are asked to give opinion. When students respond to this situation it gradually helps them to increase their power of decision making and moral development as this question and the answers on it by other people stir their mind.

Sometimes students change their opinion hearing colleague’s opinion. It is good in the sense that the teacher could take the student to desired moral development. But teacher must not give her own opinion as a senior figure her right/wrong opinion could affect the students.

On our each opinion teacher asked us some questions but never told her own opinion. Later she told us to repeat the same procedure in regular classrooms when we’ll become the teacher.
My experience of Std. 8th student is that every child has his own ideas/explanation about the situation. They do not talk philosophy but they have certain action plan. They never say let ‘Jayashree’ do it but they say that I’ll do this and that. Lastly I’ll say they have special way of thinking, unusual logic and a capacity to think with totally diverse angle.

Such situations help them for moral development in adolescent which helps them in later years. It also helps them to think about a question with various angles and to respect other’s opinion.

Thanks and warm regards,
Mrudula.

The moral development technique most often used is to present a hypothetical or factual value dilemma story which is then discussed in small groups. Students are presented with alternative viewpoints within these discussions which are in hypothesized to lead to higher, more developed moral thinking. There are three critical variables that make a dilemma appropriate:
The story must present "a real conflict for the central character", include "a number of moral issues for consideration", and "generate differences of opinion among students about the appropriate response to the situation."

A leader who can help to focus the discussion on moral reasoning.

A classroom climate that encourages students to express their moral reasoning freely.

The links :
http://www.vtaide.com/blessing/Kohlberg.htm
http://chiron.valdosta.edu/whuitt/col/affsys/values.html
http://en.wikipedia.org/wiki/Kohlberg's_stages_of_moral_development

Original post : Raju and Jayashree

Stay connected.....

It was a sports stadium. Eight Children were standing on the track to participate in the running event. * Ready! * Steady! * Bang!!! With the sound of Toy pistol, all eight girls started running. Hardly have they covered ten to fifteen steps, one of the smaller girls slipped and fell down, due to bruises and pain she started crying. When other seven girls heard this sound, stopped running, stood for a while and turned back, they all ran back to the place where the girl fell down. One among them bent, picked and kissed the girl gently and enquired 'Now pain must have reduced'. All seven girls lifted the fallen girl, pacified her, two of them held the girl firmly and they all seven joined hands together and walked together and reached the winning post.
Officials were shocked. Clapping of thousands of spectators filled the stadium. Many eyes were filled with tears and perhaps it had reached the GOD even!

YES. This happened in Hyderabad, recently !

The sport was conducted by National Institute of Mental Health.

All these special girls had come to participate in this event and they are spastic children.
Yes, they were mentally retarded.What did they teach this world?
Teamwork?
Humanity?
Equality among all? . . . . . . . . ????

"Successful people help others who are slow in learning so that they are not left far behind."
Stay connected........

Original post : Stay connected.....