Wednesday 8 October 2008

दहशतवाद्यांचे बदलते स्वरुप

गेल्या शतकातील भारतातील मुस्लिम दहशतवादी हे अशिक्षित, गरीब होते. त्यावेळी समाजशास्त्रज्ञांनी म्हटले होते की गरीबीमुळे पैश्याच्या आमिषाला भुलून तसेच मदरश्यातील मौलवींच्या कडव्या विचारसरणीला भुलून हे दहशतवादी अशी कृत्ये करायला तयार होतात. सरकारने त्यांना योग्य शैक्षणिक सुविधा व रोजगार दिला तर असे दहशतवादी तयार होणार नाहीत.
मात्र आज नेमकी उलट स्थिती आहे. जे आझमगड दहशतवाद स्रोत आहे तिथे आखातातील प्रचंड पैसा आहे. सध्या पकडलेले बहुतेक दहशतवादी उच्चशिक्षित आणि मोठ्या प्रमाणात पगार घेणारे तरुण आहेत.
असे वाटते की ह्या नव्या स्वरुपाचे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विश्लेषण होणे गरजेचे आहे कारण हे दहशतवादी मानवतेचे शत्रु आहेत.

आपल्याला काय वाटते?
(अपेक्षा इतकीच की कंधमालचा विषय मधे आणून ह्या गंभीर विषयाला फाटे फोडू नयेत. त्यासाठी हवा तर वेगळा चर्चा विषय काढावा.)

No comments:

Post a Comment